दैनिक लोकसत्ता दि.17-11-2009 मध्ये प्रकाशित माझे पत्र-
‘मराठीतून शपथ : अक्कलशून्य राजकारण’ या पत्रातील विचारांशी मी सहमत आहे. पुरोगामी महाराष्ट्रातील राजकारणाला ग्रहण लागले आहे की काय, असेच या प्रकरणी वाटते. भारताला ‘एक राष्ट्र’ या संकल्पनेपर्यंत पोहोचविण्यासाठी अनेक राजकीय, साहित्यिक, संत व समाजकारण्यांनी आयुष्य वेचले आहे. म्हणूनच एक राष्ट्र, एक ध्वज, एक राष्ट्रभाषा या तत्त्वाला तडा देण्याचे देशविघातक कृत्य कोणी करू नये.
इतिहासकार वि. का. राजवाडे एका संस्थानिकाकडे संशोधनाकरिता आर्थिक मदत मागण्यासाठी गेले. संस्थानिकाने त्यांची मागणी झिडकारत म्हटले की ‘राज्याकडे साहित्य, इतिहासासाठी खजिना नाही.’ तेव्हा राजवाडे संतापून म्हणाले, ‘जनानखान्यातील बायकांची संख्या कमी करा व लावण्यांवरील दौलतजादा कमी करा. इतिहास वाचाल तर तुमची पुढची पिढी वाचेल.’ आज सर्वच राजकारण्यांनी भारताचा व भारतीय भाषांचा इतिहास वाचण्याची गरज आहे.
भारत सरकारने राजभाषा, संपर्कभाषा, जनभाषा, धर्मभाषा, व्यवहारभाषा हिंदीकरिता काय काय केले आहे ते तपासले पाहिजे. मातृभाषेचा अभिमान सर्वानीच ठेवला पाहिजे. परंतु राष्ट्रउभारणीतले हिंदी भाषेचे योगदान समजून घेतले पाहिजे. हिंदी भाषकांना हाकलून दिल्याने महाराष्ट्रातील समस्या सुटणार नाहीत. छत्रपती शिवाजी महाराज आणि पेशव्यांनीही सरदारांशी मराठी व हिंदीतून पत्रव्यवहार केलेला आहे. महाराष्ट्र सरकारनेही मराठीनंतर हिंदीचाच स्वीकार केलेला आहे. मराठी संतांनी भारतभ्रमण करून धार्मिक विचार हिंदीतून प्रसारित केले होते.
‘मराठीतून शपथ : अक्कलशून्य राजकारण’ या पत्रातील विचारांशी मी सहमत आहे. पुरोगामी महाराष्ट्रातील राजकारणाला ग्रहण लागले आहे की काय, असेच या प्रकरणी वाटते. भारताला ‘एक राष्ट्र’ या संकल्पनेपर्यंत पोहोचविण्यासाठी अनेक राजकीय, साहित्यिक, संत व समाजकारण्यांनी आयुष्य वेचले आहे. म्हणूनच एक राष्ट्र, एक ध्वज, एक राष्ट्रभाषा या तत्त्वाला तडा देण्याचे देशविघातक कृत्य कोणी करू नये.
इतिहासकार वि. का. राजवाडे एका संस्थानिकाकडे संशोधनाकरिता आर्थिक मदत मागण्यासाठी गेले. संस्थानिकाने त्यांची मागणी झिडकारत म्हटले की ‘राज्याकडे साहित्य, इतिहासासाठी खजिना नाही.’ तेव्हा राजवाडे संतापून म्हणाले, ‘जनानखान्यातील बायकांची संख्या कमी करा व लावण्यांवरील दौलतजादा कमी करा. इतिहास वाचाल तर तुमची पुढची पिढी वाचेल.’ आज सर्वच राजकारण्यांनी भारताचा व भारतीय भाषांचा इतिहास वाचण्याची गरज आहे.
भारत सरकारने राजभाषा, संपर्कभाषा, जनभाषा, धर्मभाषा, व्यवहारभाषा हिंदीकरिता काय काय केले आहे ते तपासले पाहिजे. मातृभाषेचा अभिमान सर्वानीच ठेवला पाहिजे. परंतु राष्ट्रउभारणीतले हिंदी भाषेचे योगदान समजून घेतले पाहिजे. हिंदी भाषकांना हाकलून दिल्याने महाराष्ट्रातील समस्या सुटणार नाहीत. छत्रपती शिवाजी महाराज आणि पेशव्यांनीही सरदारांशी मराठी व हिंदीतून पत्रव्यवहार केलेला आहे. महाराष्ट्र सरकारनेही मराठीनंतर हिंदीचाच स्वीकार केलेला आहे. मराठी संतांनी भारतभ्रमण करून धार्मिक विचार हिंदीतून प्रसारित केले होते.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें