MarathiBlogNet

शुक्रवार, 22 नवंबर 2024

काबाडीचे धनी

 मराठीतील ज्येष्ठ कवी इंद्रजीत भालेराव यांचे मी काबाडीचे धनी या संग्रहाचे अकरावी आवृत्ती नुकतीच प्रकाशित करण्यात आले आहे ग्रामीण साहित्यामध्ये ही दीर्घ कविता खूपच गाजली होती कवी मंचावर या संग्रहातील अनेक संदर्भ दिलेली आहेत हा संग्रह त्याकाळी अत्यंत प्रसिद्ध व लोकप्रिय होता नुकतेच इंद्रजीत भालेकर भालेराव सरांची भेट नगर येथे झाली त्यांच्या या नवीन कोऱ्या करकरीत अकरावी आवृत्ती पुस्तक त्यांनी मला भेट केले एक साधारण वाचक या नात्याने मला खूप आनंद झाला


मी काबाडाचे धनी हा संग्रह वाचला. शेतकरी वर्गातील कुणबी हा वर्ग नेहमीच दुर्लक्षित गरीब घटक आहे. या संग्रहातील मारुती चितमपल्ली, राजन गवस यांच्या प्रतिक्रिया खूपच बोलक्या व अर्थपूर्णआहेत.


 कुणबी आई आपल्या लेकराला उपदेश करताना कुणबी कुळाचे मर्म सांगते. आपला जन्म तोंडात माती घेऊन होतो. मातीचे पीक खाऊनच तो वाढतो. त्याचा जन्मच मातीसाठी व मरण ही मातीसाठी असते. मातीला त्याने कधी विसरू नये.


कुणबी बापाचे वागणे काटेकोर, शिस्तबध्द असते. कष्ट करणे,शेती मधील सर्व कामे व्यवस्थित मार्गी लावणे यासाठी तुम्ही फारच छान भावना व्यक्त केल्या आहेत.



बाप शेत कसायचा सारे नियम पाळून जाता येता पाहायचे वाटसरू न्याहाळून धुरे बंधारे बंदिस्ती नीटनेटकी राह्याची उगा कुठं पडलेली नाही काटकी राह्याची


आधी कपाळाला माती मग पाऊल रानात रोज शेताला निवद नेई केळीच्या पानात उभ्या पिकात दिशेला कव्हा बसायचा नाही कस कमी झाल्यावर रान कसायचा नाही


दोरी न लावता सारं दोरीमधी असायचं उगवनारं धानही वरी खाली नसायचं बैल वाकडा तिकडा चालला की इकायचा गडी वाकडा तिकडा वागला की हाकायचा



समाजामधील परिस्थिती व एकूणच या व्यवस्थेविषयी चीड व्यक्त करताना आपण श्रमिक वर्गाची तीव्र भावना व्यक्त केली आहे.


कापसाच्या धाग्यातून होते कापड तय्यार पिकविणारे कापूस उघडेच राहणार 

उघडेच राहणार मातीमधी राबणारे

 राज्य करतात त्यांना पायाखाली दाबणारे


या कवितेतील काही ओळी शृंगार रस व प्रेमभावना व्यक्त करणाऱ्या आहेत. तारुण्याच्या सुलभ भावना व्यक्त करताना आपण लिहिले आहे की


कोवळ्या नजरेची कोवळी कळी पोर कोवळ्या डोळ्यातली कोवळी भिर भिर कोवळ्या छातीवर कोवळे झाले ओझे कोवळ्या चालीनं तू चालशी वजे बजे



कष्ट करणारा कुणबी शेतकरी आपल्या कुळाचे आपल्या जन्माचे सार सांगताना या माती विषयी तो श्रद्धा व्यक्त करतो ती आपण फारच सुंदर शब्दात व्यक्त केली आहे.


आता मातीशी संसार झाडझुडपच बाळ तिचा मांडून पसारा घरीदारी रानोमाळ जव्हा आलो नाळ माईच्या नाळाची तव्हापासून घासली नाळ मातीला बाळाची


भारतीय लग्न संस्थेतील सर्वच बाप आपल्या लेकीला सासरी पाठवताना काही भावना व्यक्त करत असतात.उपदेश करताना ते आपल्या मुलीला दोन गोष्टी सांगतात. त्यासाठी आपण छान शब्द योजले आहेत


बाप बोले लेकी इख खाऊन नांदाव पित्याच्या नावाचं जगी देऊळ बांधावं 

बाप बोले लेकी मन आमचं कठोर 

किती बांधला बंधारा तरी टिकल कोठोर




 कुणबी जेव्हा कष्टाने, दुःखाने पिचलेला असतो व आपल्या व्यथा घर, शेती, परिसर समाजाबद्दल, व्यवस्थेबद्दल व्यक्त करीत असतो तेव्हा ते विचार आपण अस्सल ग्रामीण ढंगात तेथील सृजनशील मातीमध्ये व्यक्त केल्या आहेत. जमीन शेती व तेथील माती त्याला कधी सोडत नाही. शेवट त्याचा तेथील मातीत होतो. परंतु एवढे दुःख वेदना सहन करण्याची कोणती आत्मिक शक्ती सांस्कृतिक पुंजी ,कुठला विठ्ठल कोणती भक्ती त्याला या जीवन प्रवासाला चालण्यासाठी प्रवृत्त करते हे समजत नाही. मला वाटते मानवी मनाच्या भावना घर, परिवार, प्राणी ,निसर्ग, जमीन यात नेहमीच गुंतलेल्या असतात.


एक कवी या नात्याने आपण गरीब कष्टकरी वर्गाच्या भावना या दीर्घ कवितेत प्रांजळपणे तेथील मातीच्या अस्सल रंग ढंग घेऊन व्यक्त केल्या आहेत. साहित्यिक मूल्य सांभाळताना आपण कोणत्याही एका विशिष्ट विचार सरणी अथवा गटा कडे न झुकता मानवी सुख दुःख प्रकट केल्या आहेत. साहित्य सृजन करताना कवी तटस्थ असावा का हा कळीचा मुद्दा असू शकेल.




या संग्रहामध्ये एक छोटीशी सूचना व्यक्त करावीशी वाटते ती म्हणजे ग्रामीण मराठवाडी भाषेतील काही विशिष्ट शब्द विचार येथे व्यक्त होतात. त्या शहरी वाचक वर्गा करिता परिशिष्टामध्ये अथवा संबंधित पानाच्या खाली व्याख्या दिली तर उत्तमच.


 या संग्रह बद्दल कवीची भूमिका महत्त्वपूर्ण असते. ती अवश्य असावीच परंतु कविता प्रकाशन ,प्रिंटिंग , चित्रे या तांत्रिक गोष्टी व अन्य प्रतिक्रिया यामध्ये असू नयेत असे माझे प्रांजळ मत आहे.आपल्या कवितेची भूमिका वाचकाला स्वतः ठरू द्यावी. कवितेवरील प्रतिक्रिया वाचल्यामुळे एक ठराविक वाट निर्माण होते. कदाचित मी लहान तोंडी मोठा घास घेत आहे क्षमस्व.


मी एक सामान्य वाचक या नात्याने माझ्या भावना

 व्यक्त केल्या आहेत. 


विजय नगरकर

अहमदनगर

शुक्रवार, 20 जनवरी 2023

भाषा आक्रमण

 "भाषा आक्रमण "


हिंदी भाषाच मुळी परकीय आक्रमणातून जन्माला आली आहे. भारतीय भाषेत अनेक परकीय भाषेतील शब्द समाविष्ट झाले आहेत. कोणत्याही भाषेला अभिजात तेव्हाच मानावे लागेल जेव्हा ती अनेक भाषिक आक्रमणाने नष्ट न होता उलट ती नवे रूप,नवा अवतार,नवा वेग घेऊन मार्ग काढते.

 भाषा अस्पृश्य नसते. भाषा ही संक्रमणातून सरमिसळ होऊन वेगाने पुढे जाणारी मानवीय घटना आहे. भाषेचे अस्तित्व हे कोणत्याही आक्रमणा मुळे किंवा परकीय भाषेमुळे संकटात येत नाही. भाषेचा वापर करणारी समाज रचना जर मोडकळीस आली तर बोल कोणास लावावे ? आपल्या भाषेचा उपयोग आपण दैनंदिन कारभारात करत नाही हे दुर्दैवी गोष्ट आहे.

महाराष्ट्रात सरकारी नोकरीत अधिकारी ते कर्मचारी या सर्व वर्गाला हिंदी चाचणी परीक्षा उत्तीर्ण करने शासकीय आदेशानुसार आवश्यक आहे.

मराठी भाषिक श्रीमती राज्येश्री जयराम यांचा धारावी झोपडपट्टीतील संवाद भाषा हा प्रबंध जरूर वाचा. केंद्रीय भारतीय भाषा संस्थान, म्हैसूर संस्थेने प्रकाशित केला आहे.

🙏

#मराठी

#हिंदी

#भाषा

#आंतर_भारती

राष्ट्र भाषा नावाचा राष्ट्रीय भाषिक गोंधळ

 ‘ राष्ट्रभाषा नावाचा राष्ट्रीय गोंधळ ‘ 


हिंदी ही भारत सरकारच्या राजकीय कामकाजा करीता 'राजभाषा' आहे.हिंदी ही राष्ट्रभाषा नाही असा न्यायालयाने निर्णय दिला आहे. भारतीय भाषा परिवारात प्रत्येक भाषेची आपली अस्मिता व महत्व आहे. प्रांतीय राजकारणा मुळे राष्ट्रभाषा या विषयावर राष्ट्रीय भाषिक गोंधळ सहेतुक पसरवला जात आहे. यामुळे मताचे व सत्तेचे हेतू साध्य होत आहेत. भारतीय घटनेत हिंदी ही राजभाषा आहे.अद्याप कोणतीही भारतीय भाषा 'राष्ट्रभाषा' घोषित केलेली नाही.उद्या भविष्यात एक देश,एक ध्वज व एक राष्ट्रभाषा धोरण ठरवले तर कोणती भाषा राष्ट्रभाषा होऊ शकते,या दृष्टीने आपण राष्ट्रभाषा व हिंदी या संकल्पनेचा विचार करूयात.

भाषा विद्वान सी.एम.बी.ब्रान यांच्या व्याखेनुसार -

[१] कोणत्याही देशाची राष्ट्रभाषा निश्चित करण्याकरीता खास चार गुणांचा सामावेश असणे आवश्यक आहे. ते गुण म्हणजे- 1) ती भाषा त्या देशाची प्रादेशिक भाषा अथवा विशिष्ट प्रदेशातील लोकांची भाषा असावी 2) क्षेत्रीय भाषा जी त्या देशातील विशिष्ट क्षेत्रात उत्तर,दक्षिण वगैरे भागातील असावी 3) सर्वसाधारण संपुर्ण देशात बोलली व समजली जाणारी भाषा किंवा जनसमूहाची भाषा 4) केंद्रीय भाषा जी त्या देशातील सरकारी कामकाजाकरीता एक राष्ट्रीय ओळख या नात्याने वापरली जाते. शेवटच्या दोन गुण विशेषांमुळे बहुतेक भाषा या त्या देशाची वास्तविक अथवा कायदेशीर राष्ट्रीय भाषा ठरते. 

महात्मा गांधी यांची व्याख्या

15 ऑगस्‍ट 1947 पूर्वी हिंदीला राष्‍ट्रभाषा म्‍हणूनच संबोधले जात होते. स्‍वातंत्र्य चळवळीत महात्‍मा गांधी यांनी सत्‍य, अहिंसा, खादी, असहकार या बरोबर हिंदी भाषेचा वापर राष्‍ट्रीय भावना संपूर्ण देशात जागृत करण्‍यासाठी केला होता. कलकत्‍ता येथील कांग्रेस अधिवेशनात त्‍यांनी लोकमान्‍य टिळक यांच्‍या इंग्रेजी भाषेबद्दल स्‍तूती केली परंतु त्‍यांनी टिळकांना सल्‍ला दिला की येथून पुढे काग्रेस च्या मंचावर फक्‍त हिंदी भाषेत भाषण दयावे ज्‍यामुळे सर्व सामान्‍य कांग्रेस कार्यकर्ता अधिक सक्रिय होऊ शकेल. 

- महात्मा गांधी हिंदी आंदोलनाचे प्रमुख नेते होते. त्यांची मातृभाषा गुजराती होती. देशाच्या अखंडते करीता व देशाला एक सूत्रात बांधणारी राष्ट्रभाषा हिंदी हीच सर्वश्रेष्ठ भाषा आहे हे त्यांनी सर्वच भारतीयांना पटवुन दिले. 20 आक्टोबंर,1917 रोजी त्यांनी भडोच येथे द्वितीय गुजरात शिक्षण संमेलनात राष्ट्रभाषा संकल्पना मांडली. ते म्हणतात-

- 1. ती भाषा सरकारी नोकरी करीता सहज समजणारी पाहिजे.

- 2. त्या भाषेमुळे भारतातील अंर्तगत धार्मिक,आर्थिक, व राजकिय कामकाज शक्य व्हावे.

- 3. ही भाषा देशातील बहुसंख्य लोक बोलणारी असावी.

- 4. ही भाषा राष्ट्राकरीता सोपी असावी.

- 5. या भाषेचा विचार करताना क्षणिक व तात्पुरता विचार केला जाऊ नये.

- या पंचसूत्राचा विचार करता त्यांनी हिंदीला राष्ट्रभाषा का संबोधले हे ध्यानात येऊ शकते.

- -

भारताची राष्ट्रभाषा 

- भारतीय भाषा परिवारात संस्कृतचे स्थान मातेचे तर इतर सर्व भाषेचे स्थान भगिनींचे आहे. यात हिंदी सर्व भारतीय भाषेची मोठी बहिण आहे. भारतीय जनगणना 1991 न्वये हिंदी भाषिकांची संख्या एकूण भारतीय लोकसंख्येच्या 40.20 इतकी आहे. केंद्रीय भारतीय भाषा संस्था म्हैसूर यांच्या आकडेवारीनुसार व जनगणना 1991 मधील सर्वेक्षणानुसार इतर भारतीय भाषेचे टक्केवारी मराठी-7.50, बंगाली-8.30,तेलुगु- 7.90, तमील-6.30, कन्नड-3.90, मल्याळी- 3.60, पंजाबी- 2.80, उडिया- 3.30, गुजराती- 4.90, उर्दू-5.20, असामी-1.40 इतकी आहे. भारतीय घटनेतील आठव्या परिच्छेदात एकूण 22 राष्ट्रीय भाषेचा सामावेश केलेला आहे. याशिवाय इतर 844 वेगवेगळ्या बोली भाषा भारतात अस्तित्वात आहेत. भारतातील हिंदीचे स्थान पाहता ती राष्ट्रभाषा होऊ शकते परंतु काही राज्यात हिंदीला राष्ट्रभाषा घोषित करण्यास विरोध आहे. भाषेच्या राजकारणात देशांची अखंडता धोक्यात येऊ नये या करीता भारताचे पहिले पंतप्रधान स्व.पंडित नेहरु यांनी इंग्रजी भाषेच्या वापरास परवानगी देऊन हिंदीला राजभाषा घोषित केले. राष्ट्रभाषा हा वाद स्वातंत्र्यापासुन विचाराधीन आहे. या करीता सर्वांचे राजकिय ऐक्य विचारात घेतल्यानंतरच राष्ट्रभाषा ठरवता येईल.


'भारत सरकारच्या प्रकाशन विभाग द्वारा प्रकाशित राष्ट्रभाषा से राजभाषा तक पुस्तकातील विचार

भारत सरकारच्या प्रकाशन विभागाने डॉ.विमलेश कांती वर्मा द्वारा लिखित हिंदी और उसकी उपभाषाएं पुस्तक प्रकाशित केले आहे. त्यांनी सरकारी आकडेवारीच्या आधारे हिंदी भाषेचा सर्वेक्षण रिपोर्ट सादर केलेला आहे. द केम्ब्रिज इनसाइक्‍लोपीडिया आफ लैंग्वेज अनुसार प्रथम वीस भाषेत हिंदीचा चौथा क्रमांक तर तसेच लोकसंख्‍ये अनुसार हिंदीचा तिसरा क्रमांक आहे. परंतु यात बिहारी बोलणा-या 6.5 करोड लोकांना जोडले तर मातृभाषा या नात्याने हिंदी जगात तिस-या क्रमांकाची भाषा आहे. भारतात द्विभाषिक स्थिति मुळे अनेक प्रातांत हिंदी ही दूसरी भाषा या नात्‍यांने प्रचारात आहे. महाराष्‍ट्रात मराठी नंतर हिंदी समजणारे 86.17 लोक हिंदीचा उपयोग करतात. भारतीय भाषा परिवारात हिंदी भाषा द्वितीय भाषा म्हणून मोठया प्रमाणात सर्वत्र वापरली जाते. 


14 सप्‍टेंबर 1949 रोजी भारताने केंद्र सरकारच्या सर्व प्रशासकिय कामकाजा करीता हिंदी भाषेचा स्‍वीकार राजभाषा या नात्याने केला आहे. घटनेतील कलम ३४३ न्वये देवनागरी लिपित लिहीली जाणारी हिंदी भाषा राजभाषा आहे. हिंदीच्या संदर्भात १९४८ रोजी चक्रवर्ती राजगोपालाचारी यांनी भारतीय घटना सभेत नॅशनल लैंग्वेज (राष्ट्रभाषा) व स्टेट लैंग्वेज (राजभाषा) शब्दांचा वापर केला. घटना समितीने स्टेट लैंग्वेज करीता हिंदीत राजभाषा हा अनुवाद केला आहे. यावर काही विद्वानांनी विरोध केलेला आहे.स्टेट लैंग्वेज ऐवजी ऑफिशियल लैंग्वेज हा शब्द स्वीकार केला गेला. ऑफिशियल लैंग्वेजचा प्रयोग अर्थात हिंदीचा प्रयोग सरकारी कामकाज,प्रशासन,लोकसभा व राज्यात विधान सभेत व न्याय पालिकेत स्वीकारी गेली आहे.

14 सप्टेबंर,1949 रोजी म्हणजे घटना अस्तित्वात येण्याअगोदरच तत्कालीन प्रबुद्ध राजकिय नेत्यांनी हिंदीचा स्वीकार केला. याच दिवशी भारतीय घटना सभेचे अध्यक्ष डॉ.राजेंद्र प्रसाद यांचे समारोपाचे भाषण झाले. त्यात त्यांनी हिंदी विषयी मार्गदर्शक चिंतन व्यक्त केले आहे. ते म्हणतात की आमच्या देशाच्या इतिहासात आतापर्यंत कधीच एका भाषेला सरकार दरबारी व प्रशासनात मान्यता मिळाली नाही. मला विश्वास आहे कि हिंदी भाषा अन्य भारतीय भाषेतील चांगली ग्राह्य गोष्टी स्वीकारील ज्यामुळे तिची अधोगती नाही तर विकासच होणार आहे. राजभाषा हिंदीच्या लोकसभेतील त्या चर्चेमुळे अनेक प्रांतात फूट पडू शकली असती परंतु तत्कालीन नेत्यांनी संयमाने व अभ्यासपूर्ण भाषणांनी लोकसभा जिंकली. एका केंद्रीय भाषेमुळे आपल्यातील अंतर दूर होईल. आमचे संबंध घनिष्ट होतील कारण आपली परंपरा,संस्कृती व सभ्यता एक आहे.

भारत सरकारच्या प्रकाशन विभागाने डॉ.विमलेश कांति वर्मा द्वारा संपादित लोकसभेतील भाषणांच्या संकलीत कागदपत्रांवर आधारीत हिंदी राष्ट्रभाषा से राजभाषा तक प्रकाशित केले आहे.यात सर्वच नेत्यांच्या भाषणांचा वृत्तांत आपणास वाचता येईल.

डॉ.जयंतीप्रसाद नौटियाल यांचे संशोधन

कोलकोता येथील कार्पोरेशन बँकेचे वरिष्ठ अधिकारी डॉ.जयंतीप्रसाद नौटियाल यांनी हिंदी भाषेच्या प्रसारावर संशोधन करुन आपला प्रबंध सादर केलेला आहे. त्यांच्या या प्रबंधात त्यांनी जागतिक आकडेवारीनुसार हे सिध्द केले आहे की हिंदी ही जगातील प्रथम क्रमाकाची भाषा आहे.त्यांनी ही आकडेवारी वर्ड अलमेनिक वरुन घेतली आहे. तसेच विविध देशातील दूतावासातील अनेक वरिष्ठ सचिवांकडून त्यांनी आकडेवारी गोळा केली आहे. त्यांच्या आकडेवारीनुसार चीन मध्ये अनेक बोली भाषा असुन त्यांचा सामावेश मंदारीन भाषेत केलेला आहे. चीन मध्ये अनेक बोली भाषिक दुसरी बोलीभाषे पासुन अनभिज्ञ आहेत. हिंदी समजणारे जगात एक अरब पेक्षा जास्त लोक आहेत जे जगातल्या अनेक देशात विभागले गेले आहेत. जगातील भाषातज्ञ हिंदीतील खडीबोलीलाच हिंदी भाषा मानतात परंतु हिंदीत अनेक बोली भाषा आहेत. उर्दूचे व्याकरण हिंदी भाषेवर आधारित आहे. ती शुध्द भारतीय भाषा आहे ज्यात काही अरबी फारसी शब्द आहेत. हिंदी जाणणारे कोणीही उर्दू भाषा सहजपणे समजू शकतात. पाकिस्तानात सिंधी,बलुची,अफगाणी या भाषा आहेत परंतु फाळणीत पाकिस्तानात भारतीय मुसलमान आपली भारतीय भाषा उर्दू तिकडे घेउन गेले. उर्दू राजकिय आश्रयामुळे तेथील स्थानिक भाषा नसुन सुध्दा राष्ट्रीय भाषा होऊ शकली.भारतात हिंदी ही द्वितीय किंवा तृतीय भाषेच्या स्वरुपात समजणारे या देशात 80 टक्के लोक आहेत. इंग्रजी लिहिता व बोलू शकणारी जनता अल्प स्वरुपात आहे.जगात इंग्रजीची टक्केवारी 4.85 इतकी आहे..

घटनेतील कलम ३५१

घटनेतील कलम ३५१ अत्यंत महत्वपूर्ण आहे. यात केंद्र सरकारने राजभाषा हिंदी शब्दाचा वापर न करता हिंदी शब्दाचा वापर केला आहे. या कलमात स्पष्ट केले आहे की भारतातील एकजीव संस्कृतीच्या सर्वच अभिव्यक्तींचा माध्यम या नात्याने हिंदीचा विकास करावा. त्या भाषेचा आत्मा न बदलता या भाषेत हिंदुस्तानी (जी भाषा म.गांधी यांना अभिप्रेत होती ज्यात उर्दू व संस्कृत भाषेचा समान वापर केलेला आहे) व घटनेतील आठव्या परिच्छेदातील सर्व भारतीय भाषांच्या ( ज्या आज मितीला २२ आहेत) प्रचलित शब्दांना आत्मसात केले जावे. अन्य भारतीय भाषेचे रुप,शैली,व पदावलीचे अनुकरण करुन मुख्यत संस्कृत व अन्य सर्व भाषेचे ( यात जगातील सर्व प्रचलित भाषा ज्यात इंग्रजी सुध्दा अंतर्भुत असेल) शब्द ग्रहण करुन हिंदी भाषा समृद्ध करावी. यामुळे हे स्पष्ट होते कि भारतात हिंदी ही भाषा कोणत्याही विशेष प्रदेशाची मक्तेदारी नाही. ती जशी महाराष्ट्राची आहे तशी ती तमीळ जनतेचेची सुध्दा आहे.

स्वातंत्र्य पूर्व चळवळीतील मतप्रवाह

स्वातंत्र्य चळवळीत हिंदीचा उल्लेख हा तत्कालीन सर्वच राजकिय नेत्यांनी राष्ट्रभाषा हाच केला . असहकार,खादी सोबत हिंदीचा राष्ट्रभाषा या नात्याने स्वातंत्र्य आंदोलनात उपयोग केला गेला होता. महात्मा गांधी यांच्या प्रेरणेने वर्धा येथे राष्ट्रभाषा प्रचार समितिची स्थापना केली गेली.

मराठी भाषीक केशव वामन पेठे यांनी 1893 मध्ये ‘राष्ट्रभाषा किंवा सर्व हिन्दुस्थानची एक भाषा करणे’ हे पुस्तक पुणे येथे प्रकाशित केले होते. या पुस्तकात त्यांनी राष्ट्रीय स्तरावर हिंदी ही सर्वस्वीकृत राष्ट्रभाषा असावी असे मत मांडले होते.

 आज वर्धा येथे केंद्र सरकारने जगातील पहिले महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ स्थापन केले आहे. या विद्यापीठाचे स्थलातंर काही उत्तरेतील प्राध्यापक वर्ग दिल्ली करणार होते परंतु राष्ट्रभाषा प्रचार समितिच्या प्रयत्ना मुळे ते तहकुब झाले. मा.मधुकर राव चौधरी यांच्या कार्यामुळे महाराष्ट्राच्या भूमिवर केंद्र सरकारचा हा आंतरराष्ट्रीय प्रकल्प उभा राहीला आहे. त्यांनी नागपुर येथे पहिले आंतराष्ट्रीय हिंदी सम्मेलन 10 जानेवारी,1975 रोजी आयोजित केल्यामुळे आज जगात सर्वत्र व सर्व दूतावासात 10 जानेवारी हा विश्व हिंदी दिवस पाळला जातो. 14 सप्टेबंर 1949 रोजी राजभाषा हिंदी स्वीकारल्या मुळे केंद्र सरकारच्या सर्व कार्यालयात 14 सप्टेबंर हा हिंदी दिवस पाळला जातो. याचे श्रेय सुध्दा वर्धा येथील राष्ट्रभाषा प्रचार समितीलाच आहे.

पुणे येथे महाराष्ट्र राष्ट्रभाषा प्रचार समिति स्थापन केली आहे.


युरोपात अनेक देशांची राष्ट्रभाषा संकल्पना अद्याप निश्चित झालेली नाही. अमेरिका जिथे इंग्रजी भाषेचे वर्चस्व आहे तिथे सिनेट मध्ये राष्ट्रभाषा प्रस्ताव लंबीत आहे.तेथील मूळ भूमिपुत्र रेड इंडियन यांचा इंग्रजी राष्ट्रभाषेला विरोध आहे.अमेरिका ही मिश्र संस्कृती आहे. 


आशियातील देशांची राष्ट्रभाषा

आशियातील अनेक देश युरोपातील काही देशांचे गुलाम होते. त्यामुळे आशियातील अनेक देशात तेथील भाषेचे स्थान इंग्रजी,फ्रेंच इत्यादी परकीय भाषे समोर गौण ठरले आहे.


 हिंदी संमेलन,परिसंवाद,कार्यशाळा याकरीता जेव्हा कधी मला उत्तर भारतात जावे लागते तेव्हा तेथील लोक महाराष्ट्राच्या विकासा बध्दल तसेच मराठी लोकांच्या प्रगल्भ राष्ट्रप्रेमा बद्धल प्रशंसा व्यक्त करतात. राष्ट्रभाषा हिंदी प्रचारातील महाराष्ट्राचे योगदान ते मान्य करतात. जाज्वल्य राष्ट्रभक्ती साठी महाराष्ट्रातील विनायक दामोदर सावरकर, लोकमान्य टिळक, विनोबा भावे, महात्मा फुले, नामदार गोपाळ कृष्ण गोखले, आगरकर, कर्वे यांचा आदराने उल्लेख केला जातो. 1857 चा उठाव असो किंवा 1942 ची चले जाव चळवळ असो या सर्वच राष्ट्रीय आंदोलनात महाराष्ट्राचे नांव अग्रभागी आहे. राष्ट्रीय आंदोलनातील महाराष्ट्राचे नांव सर्वच भारतात आदराने घेतले जाते.


हिंदीत रोजगाराच्या अनेक वाटा आहेत, यात अनुवाद, पत्रकारीता, दूरदर्शन,चित्रपट,जाहिरात,विपणन,व्यापार,पर्यटन,धार्मिक संस्था इ. अनेक क्षेत्रात महाराष्ट्रातील तरुणांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो. प्रत्येक देशातील राष्ट्रभाषेला इतिहास आहे. गुलामीत राहिल्यानंतरच खुद्द इंग्लंड मध्ये इंग्रजी भाषेला १३ व्या शतकापर्यंत फ्रेंच भाषेशी संघर्ष करावा लागला. राजभाषा हिंदीचा इतिहास तर आता कोठे 71 वर्षाचा झालेला आहे भाषेची लढाई अनेक काळापर्यंत चालणारी आहे. भाषेचे विद्वान सांगतात की आधी मातृभाषेचा आदर करा तेव्हा कोठे तुम्ही राष्ट्रभाषेचा आदर करु शकाल. 

संदर्भ

हिंदी विकिपीडिया

भारतीय भाषा सर्वे भारतीय भाषा संस्थान म्हैसुर भारत सरकार (इंग्रजी संकेतस्थळ)

राष्ट्रभाषा से राजभाषा तक डॉ.विमलेशकांत वर्मा ,(प्रकाशन विभाग,भारत सरकार)


~ विजय नगरकर

अहमदनगर, महाराष्ट्र

vpnagarkar@gmail.com

9422726400

9657774990



शुक्रवार, 25 नवंबर 2022

खेतीहर मजदूर

 डच कविता 'खेतीहर मजदूर' के मेरे अनुवाद को विजय नगरकर जी ने मराठी भाषा में अनूदित किया है।

डच कविता का हिंदी अनुवाद नीचे है। 


शेत मजूर

(De Ploeger) 


मला नको पिकातील दाणा,

रक्षण करण्या नाही 

छप्पर माझ्या डोक्यावर,

माझा काय अधिकार आहे

 माझी संपत्ति तुमचीच आहे ,


माझी संपत्ती फक्त एकच आहे-

तुझ्या शब्दांना मी दिशा देत आहे

प्रवासी आहे तुझ्याच आदेशाचा

नांगर चालवितो तुझ्या

शब्दांचा,


तूच मला ही जबाबदारी दिली आहे

अफाट ही भूमी व उंच पसरलेली शेती

तू विकत घेतली आहे

माझी इच्छा घोड्यासहित,


नजर जाते तेथे 

पाहतो मी समुद्र,

माझे शरीर थकले आहे

दुर्बळ व शांत झाले आहे,


आता इच्छा एकाच आहे

हे शक्तिमान -


हे उपकार सहन करण्यासाठी

जन्म घेतला मी शरद ऋतूत

आणि याच जगात मरणार आहे,


तुम्ही सर्व जाणकार आहात

करून विलाप रडणे व्यर्थ आहे

माझ्या चारी दिशेला 

फेर धरला आहे भूतकाळातील सुखद आठवणीने,

उदासता ही मला टाळीत आहे


आता मी या मातीत मिसळून गेलो आहे

आता मी फुलणाऱ्या कळ्यांना पाहू शकणार नाही

मी फिरून एकदा आशेचे पूल बांधू शकणार नाही


तुम्ही फक्त माझ्या पिकावर विश्वास ठेवा

मी तुमची सेवा करीत राहील

प्रारंभा पासुन अंता पर्यंत,

तुमच्या स्वार्था साठी

तुम्ही मला निवडले आहे.


या भूमीवर एक मनाने नांगर धरणारा

एक सुंदर भूमी निर्माण करण्यासाठी,

 ढळत्या संध्याकाळी

लालीमेत निःसंग प्रेम 

करणे गुन्हा आहे

सरळ धोपट मार्ग सोडून

ही अज्ञात उडी आहे


नम्रपणे झुकलेल्या 

अग्नीत जळणाऱ्या

त्याच्या घरातील

तो एक त्याग दीप आहे

तो एक शेत मजूर आहे.


 मराठी अनुवाद-विजय नगरकर, अहमदनगर,महाराष्ट्र

vpnagarkar@gmail.com

+919422726400


मुळ डच कवि -

आद्रियान रोनाल्ड होल्स्ट


आधारित-

( डच भाषा का हिन्दी अनुवाद : रामा तक्षक )


कविता रूट पर लगी विभिन्न डच कवि /कवयित्रियों की कविताओं को पढ़ने का अवसर मिला। उन्हीं में से एक अन्य कविता का फोटो व उसका हिन्दी में अनुवाद।। 

यह कविता आद्रियान रोनाल्ड होल्स्ट की है। यह कवि अपने मित्र यूप निकोलस के घर नाब्बेन गाँव में मिलने आया करता था। नाब्बेन गाँव कविता रूट का हिस्सा है। 


De ploeger 


खेतीहर मजदूर 


नहीं चाहिए मुझे फसल का अनाज,

रखने को छान छप्पर हैं नहीं मेरे पास,

कुछ अधिकार नहीं है मेरा अपना,

सम्पदा हूँ, मैं तुम्हारी ही।


सम्पत्ति मेरी केवल है एक ही -

दिशाएँ मैं देता रहूँ तुम्हारे शब्दों को।

बनता रहूँ कारवां, तुम्हारी जीभ का। 

हल चलाता रहूँ, तुम्हारे शब्दों का ।


है दायित्व सौंपा है तू ने मुझे,

बीच विस्तृत भूमि और ये ऊंचे खेत, 

खरीद लिया है तूने मेरी इच्छा के घोड़ों के साथ।

जहाँ तक मैं देखता हूँ समुद्र मुझे दिखाई देता है।

हो चुकी है, मेरी थकान शांत और दुर्बल।


चाह मेरी केवल है एक - ताकत।

इस अहसास को सहन करने के लिए कि मैं 

पैदा हुआ था शरद ऋतु में, 

और इसी दुनिया में होगा मेरा मरण। 


आप भले से जानते हैं कि कैसे, 

फफक सुबकने वाले विलाप के रूप में,

मेरे चारों ओर घूमती, 

उस बीती हुई सुंदरता में से, 

उदासी भी मेरा टालमटोल करती है।


अब तो मैं तुममें लगभग 

खो सा गया हूँ - मैं फिर से 

कलियों को नहीं देखूंगा।


न ही आशाओं के पुल कभी बांधूंगा, 


आप केवल मुझे फसल में विश्वास दिलाएं,


ताकि मैं सेवा करता रहूँ - 

शुरू से आखिरी तक।

ताकि मैं यह जान सकूँ

कि आपके उद्देश्य ने मुझे चुना है।


भूमि पर एक मन से हल चलाने वाला बनना,

एक सुंदरता के निर्माण के लिए; 


ढ़लती साँझ की लालिमा सा 

अकेले में प्यार करना खिलाफत है।

वह सही राह चलते, पटरी छोड़ छलांग है। 

  

नम्रतापूर्वक झुके रहना ही  

उसके घर का जलता हुआ,

त्याग की मृत्यु का, 

मंद चिराग, एक खेतिहर मजदूर। 


( डच भाषा का हिन्दी अनुवाद : रामा तक्षक )

खेळत राहते

 आई जेव्हा एकटी असते

 तेव्हा निवांत क्षणी बटनाशी

खेळत राहते


ती बटणे जुन्या कपड्यां पासून वेगळी काढत राहते

जमा करते,

कधी तरी उपयोगी पडतील,


प्रत्येक बटणावर हळुवार हात फिरवते व त्याची रचना न्याहाळीत राहते,


बटणाशी निगडित जुने कपडे

कपड्यांशी निगडित व्यक्ती

आठवत राहते त्यांची नाती

व हरवलेली प्रत्येक व्यक्ती,


विविध रंग,आकार व रचनेची

बटणे

नातीच्या सहाव्या जन्म दिवशी तीने घातलेला गाऊन

 आठवीत राहते

लाल फ्रॉक वर किती सुंदर दिसत होता मोत्यांचा सजावटी बटण


हे बटण त्यांच्या रेशमी शर्टाचा

हे बटण बिट्टूच्या फुल पॅण्ट चे, 


आई ती बटणे वर्तमान पत्रावर

तर कधी ओंजळीत घेते

 तिला आठवतात कधी सागरगोटे तर कधी गोटी, 


लिंबाच्या झाडाच्या खाली

काली मातेचे मंदिर

तिला आठवते तिच्या आईच्या ब्लॉऊज चे बटण

ती सांगत राही

माझ्या म्हातारीच्या डोळ्यांना

काजे बटण सापडतात

तुमचे ते हुक अडकवणे नाही जमत, 


ती कधी बाबूजी यांच्या

खादी शर्टाची बटणे 

शोधीत राहते इथे-तिथे


ती स्वतः चे अस्तित्व विसरून

नात्यांच्या आठवणीत हरवते

या बटणामुळे दिवस कसा जातो,समजत नाही

एकटेपणात बटणे तिला

साथ देतात.


******

मूळ हिंदी कविता-

 अनामिका अनु


मराठी अनुवाद- 

विजय नगरकर

बेकद्रे

 होशियारपुर, पंजाब येथील माझे मित्र डॉ धर्मपाल साहिल हे हिंदी व पंजाबी भाषेतील एक सुप्रसिद्ध लेखक कादंबरीकार आहेत. त्यांनी आत्तापर्यंत अनेक कथा लघुकथा व कादंबरी लेखन केले आहे. त्यांच्या साहित्यात नेहमीच सामाजिक प्रश्नांचा मागोवा घेतलेला दिसतो. ते ज्या ठिकाणी राहतात नोकरी करतात तेथील सामाजिक प्रश्न, लोकांच्या चालीरीती यांचा शोध घेतात. त्यांच्या साहित्यातील आशय संपन्न लोकभाषा मन मोहून घेते.  


 त्यांची ' बेकद्रे ' नावाची संक्षिप्त हिंदी कविता खूपच सामर्थ्य शाली आहे. या छोट्या कवितेत त्यांनी फार मोठा संदेश दिलेला आहे. आपण आपल्या प्रिय पुस्तकावर खूप प्रेम करतो. त्याला जपतो सांभाळतो. परंतु कृतघ्न लोक मात्र त्या पुस्तकाचे मुखपृष्ठ पाहतात,पाने उल्टवतात व कपाटात बंद करून टाकतात. हीच उपमा त्यांनी आपल्या घरातील उपवर मुली संदर्भात केली आहे. पुस्तक असो वा मुलगी आपण नेहमीच कृतघ्न लोकांच्या हाती देऊन त्यांचा गळा आवळून हत्या करतो. 


कृतघ्न


मुखपृष्ठ न्याहाळताना

पाने चाळवली जातात

नंतर कपाटात

कैद करतात

किंवा रद्दीत विकली जातात,

पुस्तके अथवा मुली

कृतघ्न लोकांच्या हाती देत

आम्ही नेहमीच त्यांचा 

गळा आवळतो.

****

मूळ हिंदी कविता - 

डॉ धर्मपाल साहिल

मराठी अनुवाद - विजय प्रभाकर नगरकर 


***

मूळ हिंदी कविता


बेकद्रे

*****

जिल्द देखते हैं

पन्ने पलटते हैं

फिर अलमारी में

क़ैद कर देते हैं

या रद्दी में

बेच देते हैं

किताबें हों या बेटियां

बेकद्रे हाथों में देकर

हम उनका

गला घोंट देते हैं.


 -डॉ धर्मपाल साहिल

Dharampal Sahil

चाबी

 जेव्हा युद्ध सुरू होते, विमान,क्षेपणास्त्र बॉम्ब वर्षाव करू लागतात,तेव्हा सामान्य नागरिक घर सोडतो,देश सोडतो. या प्रसंगावर हिंदीच्या वरिष्ठ कवयित्री डॉ रती सक्सेना यांनी एक मार्मिक कविता लिहिली आहे. चाबी या कवितेचा मराठी अनुवाद सादर प्रस्तुत - 


घर सोडून जाताना

त्याने घराची चावी

आपल्या खिशात ठेवली होती,

त्याने दरवाजा बंद आहे 

 का उघडा आहे हे पाहिले नाही,


बंद जरी असता तरी

तिन्ही बाजूने भिंती उध्वस्त होत्या

ते कुलूप घराचे काय रक्षण करणार?


तरी त्याचे मन निश्चिंत होते

त्याच्या घराची चावी

त्याच्या खिशात सुखरूप आहे

जी चावी त्याला अनोळखी देशात भरोसा देत राहील की

त्याचे स्वतःचे एक घर

 या विश्वात आहे,


निराधार जीवनात

जेव्हा भुकेच्या ज्वाळा

त्याला कवेत घेऊन वर उठतील,

तेव्हा त्याला घरच्या खरपूस भाकरीचा गंध जाणवेल,


त्याने फक्त चावी नाही तर

एक संपूर्ण त्याचे विश्व

खिशात ठेवले आहे.


****

मूळ हिंदी कविता - रती सक्सेना

मराठी अनुवाद - विजय नगरकर


*****

मूल हिंदी कविता - 


घर से भागते वक़्त उसने

घर की चाभी अपनी जेब में रख ली

बिना यह देखे कि दरवाजा बन्द है या नहीं

बन्द होता तो भी तीन तरफ ढही दीवारें

घर को क्या पनाह देती


फिर भी उसे सकून था कि

एक चाभी उसकी जेब में है

जो उसके अपने घर की है


जो उसे किसी भी अजनबी जगह पर

यह अहसास कराती रहेगी कि

उसका भी अपना घर है

आड़े वक़्त में जब

उसकी भूख की लपटें

कहीं ऊँची उठ जाएंगी

रोटी की महक से रुबरु कर सकेगी


उसने चाभी नहीं एक दुनिया

रख ली अपने साथ


(चाबी)


#ratisaxena Rati Saxena

ठाकुर का कुंआ मराठी अनुवाद

 मराठी अनुवाद


ओमप्रकाश वाल्‍मीकि हिंदी साहित्यातील सुप्रसिद्ध कवि,लेखक, सामाजिक विचारवंत। त्यांचे दलित आत्मचरित्र 'जूठन' विशेष प्रसिद्ध।

त्यांच्या गाजलेल्या कवितेचा मराठी अनुवाद सादर प्रस्तुत.


ठाकुर का कुआँ / ओमप्रकाश वाल्‍मीकि


चूल मातीची

माती तलावाची

तलाव पाटलाचा,


भूक भाकरीची

भाकरी बाजरीची

बाजरी शेताची

शेत पाटलाचे,


बैल पाटलाचे

नांगर पाटलाचा

नांगराच्या मुठीवर हात आमचा

पीक पाटलाचे,


विहीर पाटलाची

पाणी पाटलाचे

शेत - जमीनी पाटलाच्या

गल्ली - रस्ते पाटलाचे

तर मग आमचे काय?

गाव ?

शहर ?

देश ?


( सदियों का संताप संग्रह से साभार)


मूल हिंदी कविता - ओमप्रकाश वाल्‍मीकि

मराठी अनुवाद - विजय नगरकर


*******


मूळ हिंदी कविता - 


' ठाकुर का कुआँ '


चूल्‍हा मिट्टी का

मिट्टी तालाब की

तालाब ठाकुर का ।


भूख रोटी की

रोटी बाजरे की

बाजरा खेत का

खेत ठाकुर का ।


बैल ठाकुर का

हल ठाकुर का

हल की मूठ पर हथेली अपनी

फ़सल ठाकुर की ।


कुआँ ठाकुर का

पानी ठाकुर का

खेत-खलिहान ठाकुर के

गली-मुहल्‍ले ठाकुर के


फिर अपना क्‍या ?

गाँव ?

शहर ?

देश ?


~ ओमप्रकाश वाल्‍मीकि


(सदियों का संताप संग्रह से साभार)

(नवम्बर, 1981)

संतोष पद्माकर #अनुवाद

आलेपाक



काल नारायण माने काका गंज बाजारात भेटले. आवर्जून त्यांच्याकडून आलेपाक वडी खरेदी केली.


 मी त्यांना विचारले

“तुमचा आवाज काढून तुमची आलेपाक वडी दुसरा कोणीतरी प्रोफेसर कॉलनी भिस्तबाग रोड येथे रिक्षा फिरून विकत आहे, तुमचा आवाज त्याने रेकॉर्ड केलेला आहे”


तेव्हा माने काका म्हणाले 

“तो माझाच मुलगा आहे, तो रिक्षातून  आलेपाक वडी विकत असतो “


मी विचारले

“ तुमचा मुलगा आलेपाक वडी रिक्षा फिरून विकतो मग तुम्ही त्याच्या सोबत रिक्षा करून फिरत का नाहीत ?”

 तेव्हा ते म्हणाले “बेटा मला आलेपाल वडीने या शहरात खूप फिरवले आहे.त्यामुळेच मी आज सुद्धा तंदुरुस्त आहे व फिरू शकतो. आज नवीन पिढीला पायी चालणे कुठे आवडते?


काल काका गर्दीत सायकल पासून आलेपाक वाचवत होते आज नवीन तरुण मुलांच्या लाखों किमतीच्या बाईक पासून आले पाक वाचवत संथ पावले टाकीत जीवन पुढे नेत आहेत.


माने काका यांना आता चालणे होत नाही असे दिसते. त्यांची पावले संथ पडत होती. तरीसुद्धा ते आलेपाक वडी नित्यनेमाने विकत आहेत.


पन्नास वर्षांपूर्वी मी आलेपाक वडी घेतली होती. तोच गुलाबी कागद,फक्त आज त्यावर त्यांचे नांव,मोबाईल नंबर प्रिंट केलेला आहे. आयुर्वेदिक आलेपाक वडीत आरोग्य रक्षक लेंडी पिंपळी,लवंग तसेच औसलोचन (म्हणजे काय?) यांचा समावेश आहे. 


माझ्या बालपणी त्यांची “ सर्दीला, पडशाला,पित्ताला आलेपाक “ ही आरोळी लक्ष वेधून घेत होती,आजही तोच आवाज खणखणीत आरोळी मारून आलेपाक विकत आहे.

सोमवार, 30 जुलाई 2018

वाहते ही प्रेम गंगा



जीवन एक आग आहे संघर्षाची

तापत रहा

प्रत्येक आगीच्या लाटेत

सोने बनुन निखरत रहा

लालसर प्रकाश किरणाने

मार्ग उजळीत रहा,


जीवन एक पहाट आहे

प्रत्येक क्षणी चालत रहा

प्रत्येक मनाचे  अंगण

सुंगधाने उजळीत वाहणारी

हवा जीवन आहे,


पाखर्याच्या पंखात

उडण्याचे बऴ देणारे

जीवन हे आकाश आहे

उंचावर झेप घेत रहा,


स्वत:ला  पेटवून 

अंधाराला प्रकाश देत रहा

जीवन ही मेणबत्ती आहे

संथपणे पिघळत जा,

थांबणे ही मरणाची निशानी आहे

जीवन मार्ग आहे

अथक चालत रहा,


थकलेल्या मनाला

आल्हाद देणारी

जीवन ही संध्याकाळ आहे

बिनधास्तपणे एकरुप हो

ह्रद्याच्या भावनेला

पदरात घेउन चालत रहा, 

जीवन प्रेम आहे

कधी  स्वतःला सावर
कधी समर्पण करीत रहा


(मूल हिंदी कविता- प्रेम से बहते रहिए – डॉ अन्नपुर्णा सिसोदिया


मराठी अनुवाद-  विजय नगरकर )


 


वाहत रहा प्रेमाने


वाहत रहा प्रेमाने
जीवन एक आग आहे संघर्षाची
तापत रहा
प्रत्येक आगीच्या लाटेत
सोने बनुन निखरत रहा
लालसर प्रकाश किरणाने
मार्ग उजळीत रहा

जीवन एक पहाट आहे
प्रत्येक क्षणी चालत रहा
प्रत्येक मनाचे  अंगण
सुंगधाने उजळीत वाहणारी
हवा जीवन आहे,

पाखर्याच्या पंखात
उडण्याचे बऴ देणारे
जीवन हे आकाश आहे
उंचावर जात रहा,

स्वत:ला नष्ट करत
अंधाराला प्रकाश देत रहा
जीवन ही मेणबत्ती आहे
संथपणे पिघळत जा,

थांबणे ही मरणाची निशानी आहे
जीवन मार्ग आहे
अथक चालत रहा,

थकलेल्या मनाला
आल्हाद देणारी
जीवन ही संध्याकाळ आहे
बिनधास्तपणे एकरुप हो
ह्रद्याच्या भावनेला
पदरात घेउन चालत रहा
जीवन प्रेम आहे
कधी सावर कधी समर्पण करीत रहा

(मुल हिंदी कविता- प्रेम से बहते रहिए – डॉ अन्नपुर्णा सिसोदिया
मराठी अनुवाद-  विजय नगरकर )





गुरुवार, 14 जून 2018

काय मिळाले असते

"काय मिळाले असते ? "

स्त्रीच्या भावनेचा सिटी स्कॅन केला तर
अपमानाच्या असंख्य घटनांचा
धोकादायक साकाळलेला डोह मिळाला असता,
निराशेच्या गंभीर जखमेतील
वाहती वेदना दिसली असती,
अगतिक बैचेनीची आकडेवारी
लक्ष्मण रेषा ओलांडताना दिसली असती
ताटातुटीच्या भयाने वाढलेली गती
अनेक रात्र  जागलेल्या आसवांनी
बेफाण पुरात वाहाताना,
कंठात रुतलेले उत्तर दिसले असते
सकारण हारलेले वादविवाद
दयनीय अवस्थेत मिळाले असते
उपेक्षेच्या डंखाचे निशान

त्या मशीनला ऐकू आली असती
कोंडलेल्या  हुंदक्यांची आर्तता
रिक्तपणाचे साचलेले मळभाचे घनदाट आकाश
अगतिक रात्रीच्या बदलेल्या असंख्य कुशी
धोक्याच्या निशानीच्या वर पोहचलेल्या,
प्रेम याचनेचा उच्च स्वर आकाशाला भिडणारा
वेदना लपवून ठेवण्याचा चिंताजनक ग्राफ

सहन केलेले टोमणे व टोचून बोलले स्वर
छिन्न भिन्न स्वप्नांचा एक मोठा पुंजका  मिळाला असता
अनवरत टिकेचे खोल व्रण दिसले असते
भावना शोधणारी मशीन असती तर
सुहास्य मुद्रे मागील
वेदनेचे सत्य समोर आले असते

मुळ हिंदी कविता-  " क्या क्या मिलता "
                           
डॉ मधु चतुर्वेदी,मुम्बई
मराठी अनुवाद-        विजय नगरकर

चि सौ कां

पुस्तकांच्या कपाटात ती सोडुन जाते
कव्हरवर लिहिलेले तीचे नांव
भिंतीवर टांगलेली सुंदर ऑईल पेंटिंग तसबीर
चित्राच्या एका कोपर्यात लिहिलेले तिचे नांव
एका नाजुक जाणीवेच्या अबोल निशानीसह
ती घर सोडुन जाते,
मांडव परतणीच्या क्षणाला
मुलगी मागे वळुन न पाहता
मेहंदी लावलेल्या पावलांनी निरोप घेते,

स्वयंपाक घरातील नव्या फॅशनच्या क्रॉकरी
तिच्या पसंतीची बैठक सज्जा, सोफा
तिच्या कपाटातील ठेवून दिलेली ठेवणीतील कपडे
खरेदी केलेल्या तमाम नव्या वस्तु बॅगेत भरुन
अंगणातल्या तुळशी खाली आपले मन दफन करुन
मुली आपला निरोप घेतात.

भकास या घरात आता आठवतात तिचा निरागस स्पर्ष
पुजेच्या घरातील रांगोळीत बुडालेले तिचे सुंगधी हात
घर आंगण सोडताना साश्रु  नयनांनी
मांडव परतणीच्या क्षणाला
मुलगी मागे वळुन न पाहता
मेहंदी लावलेल्या पावलांनी निरोप घेते,

फोटो अल्बम मधील तीची सुहास्य मुद्रा
धुळीने माखलेले पदक व पुरस्कार चिह्न
ठेवून जाते परसदारी फुललेली झेंडुची फुले
बाहुलीला गुंडाळलेली जुनी पुरानी साडी
उदास खेळण्यात उदास विराणी सोडुन जातात मुली,
मुली निरोप घेतानी मनाला चटका लावुन जातात,
टिव्हीवर तिच्या लग्नाची सीडी पाहताना
तिच्या निरोपाचा क्षण येतो तेव्हा
बाप जागा सोडुन उठुन जातो,

सर्व नखरे एका टोपलीत घेउन
मुली निरोप घेताना मनाला चटका लावून जाते

( मूल हिंदी कविता-  मधु चतुर्वेदी)
मराठी अनुवाद- विजय नगरकर)

बुधवार, 9 मई 2018

काय मिळाले असते ?

"काय मिळाले असते ? "

स्त्रीच्या भावनेचा सिटी स्कॅन केला तर
अपमानाच्या असंख्य घटनांचा
धोकादायक साकाळलेला डोह मिळाला असता,
निराशेच्या गंभीर जखमेतील
वाहती वेदना दिसली असती,
अगतिक बैचेनीची आकडेवारी
लक्ष्मण रेषा ओलांडताना दिसली असती
ताटातुटीच्या भयाने वाढलेली गती
अनेक रात्र  जागलेल्या आसवांनी
बेफाण पुरात वाहाताना,
कंठात रुतलेले उत्तर दिसले असते
सकारण हारलेले वादविवाद
दयनीय अवस्थेत मिळाले असते
उपेक्षेच्या डंखाचे निशान

त्या मशीनला ऐकू आली असती
कोंडलेल्या  हुंदक्यांची आर्तता
रिक्तपणाचे साचलेले मळभाचे घनदाट आकाश
अगतिक रात्रीच्या बदलेल्या असंख्य कुशी
धोक्याच्या निशानीच्या वर पोहचलेल्या,
प्रेम याचनेचा उच्च स्वर आकाशाला भिडणारा
वेदना लपवून ठेवण्याचा चिंताजनक ग्राफ

सहन केलेले टोमणे व टोचून बोलले स्वर
छिन्न भिन्न स्वप्नांचा एक मोठा पुंजका  मिळाला असता
अनवरत टिकेचे खोल व्रण दिसले असते
भावना शोधणारी मशीन असती तर
सुहास्य मुद्रे मागील
वेदनेचे सत्य समोर आले असते

मुळ हिंदी कविता-  " क्या क्या मिलता "
                             डॉ मधु चतुर्वेदी,मुम्बई
मराठी अनुवाद-        विजय नगरकर

शनिवार, 16 अप्रैल 2016

हे काही ठीक नाही

कसे सांगावे त्यांना एवढे जळणे चांगले नाही
जे सांगतात माझे चाल चलन ठीक नाही,
खोटयाचे खरे सांगणे कला आहे परंतु
स्वतःचे अपराध झाकण्याची ही कला ठीक नाही,
ज्यांच्या मनात पाप असेल त्यांनी घर सोडु नये
वादळी पावसात मातीची ही काया काढणे ठीक नाही,
खुशाल ही बाग़ या पक्ष्यानी सोडून द्यावी
ज्याना वाटते हा देश आपला ठीक नाही,
प्रत्येक गल्लीत इथे शांतता व सन्नाटा आहे
माझ्या देशात हा अबोला काही ठीक नाही,
जे नेहमीच पेहराव बदलण्याचे शौकीन आहेत
अंतिम समयी सांगू शकत नाहीत की हे कफ़न ठीक नाही।
(हिंदी शायरीचा मी केलेला मराठी अनुवाद)

गुरुवार, 26 जुलाई 2012

भाषाभगिनींमध्ये निर्थक वाद नको

दैनिक लोकसत्ता दि.17-11-2009 मध्ये प्रकाशित माझे पत्र-
‘मराठीतून शपथ : अक्कलशून्य राजकारण’ या पत्रातील विचारांशी मी सहमत आहे. पुरोगामी महाराष्ट्रातील राजकारणाला ग्रहण लागले आहे की काय, असेच या प्रकरणी वाटते. भारताला ‘एक राष्ट्र’ या संकल्पनेपर्यंत पोहोचविण्यासाठी अनेक राजकीय, साहित्यिक, संत व समाजकारण्यांनी आयुष्य वेचले आहे. म्हणूनच एक राष्ट्र, एक ध्वज, एक राष्ट्रभाषा या तत्त्वाला तडा देण्याचे देशविघातक कृत्य कोणी करू नये.
इतिहासकार वि. का. राजवाडे एका संस्थानिकाकडे संशोधनाकरिता आर्थिक मदत मागण्यासाठी गेले. संस्थानिकाने त्यांची मागणी झिडकारत म्हटले की ‘राज्याकडे साहित्य, इतिहासासाठी खजिना नाही.’ तेव्हा राजवाडे संतापून म्हणाले, ‘जनानखान्यातील बायकांची संख्या कमी करा व लावण्यांवरील दौलतजादा कमी करा. इतिहास वाचाल तर तुमची पुढची पिढी वाचेल.’ आज सर्वच राजकारण्यांनी भारताचा व भारतीय भाषांचा इतिहास वाचण्याची गरज आहे.
भारत सरकारने राजभाषा, संपर्कभाषा, जनभाषा, धर्मभाषा, व्यवहारभाषा हिंदीकरिता काय काय केले आहे ते तपासले पाहिजे. मातृभाषेचा अभिमान सर्वानीच ठेवला पाहिजे. परंतु राष्ट्रउभारणीतले हिंदी भाषेचे योगदान समजून घेतले पाहिजे. हिंदी भाषकांना हाकलून दिल्याने महाराष्ट्रातील समस्या सुटणार नाहीत. छत्रपती शिवाजी महाराज आणि पेशव्यांनीही सरदारांशी मराठी व हिंदीतून पत्रव्यवहार केलेला आहे. महाराष्ट्र सरकारनेही मराठीनंतर हिंदीचाच स्वीकार केलेला आहे. मराठी संतांनी भारतभ्रमण करून धार्मिक विचार हिंदीतून प्रसारित केले होते.

पहला गिरमिटिया









दक्षिण अफ्रिकेतील महात्मा गांधी यांच्या जीवनावर आधारित ऐतिहासिक कांदबरी पहला गिरमिटिया सुप्रसिद हिंदी साहित्यकार श्री गिरिराज किशोर यांनी लिहिली आहे. ऐतिहासिक कांदबरी लिहिताना भूतकाळातील घटना, प्रसंग, वास्तु, शहर, देश व तत्कालीन सामाजिक स्थितीचा अभ्यास करावा लागतो. या साठी लेखकाने दक्षिण अफ्रिकेचा दौरा केला आहे. दक्षिण अफ्रिकेतील महात्मा गांधीच्या आठवणीवर आधारित ही एक सामाजिक राजकीय कांदबरी आहे. कांदबरीच्या सुरुवातीला अपर्ण पत्रिकेत लेखकाने च् त्या भारतीयांना व त्यांच्या संततीला जे 19 व्या शतकामये दूर परदेशात गिरमिटिया व यात्रीच्या रुपाने समृदिचा पूल बनले, जे पुन्हा काधीच परतले नाहीत त्या भारतीयांना ज्यांना समुद्राने गिळंकृत केले आणि त्यांच्या संततीला जे समुद्राच्या लाटावर आमरण जीवंत राहिले, येणा-या काळात वाढणा-या माझ्या नातवाला च्तन्मय छ व नातीला च् वान्या छ ज्यांना मोहनदास समजून घेणे कदाचित अत्यंत जरुरीचे आहे. मोहनदास च्या रुपात जो आपल्या देशाकरीता, लोकांकरीत व स्वातंत्र्याकरीता, परक्या भूमिवर झटला आणि महात्मा गांधीच्या रुपाने आपलाच भूमीवर गोळी
झेलून राम-राम म्हणत कायमचा निघून गेला.
19 व्या शतकात इंग्रजांनी दक्षिण अफ्रिकेतील वसाहतीत हिंदुस्तान माधील मजूरांची फार मोठया प्रमाणात करारावर आयात केली. उत्तर भारतीय अडाणी ग्रामीण मजुर तत्कालीन एग्रीमेंट या शब्दाचा उच्चार गिरमिट असा करीत. त्यामुळे एग्रीमेंट वर परदेशात गेलेल्या मजुराला गिरमिटिया संबोधले जाउ लागले. महात्मा गांधी सुदा दक्षिण अफ्रिकेत डर्बन येथे नोकरीसाठी सेठ दादा अब्दुल्ला यांच्याकडे कराराने गेले होते. त्यामुळे ते सुदा गिरमिटियाच होते.
गो-या लोकांनी जगावर राज्य केले. अनेक वसाहती निमार्ण केल्या. अमेरिकेतील काळया लोकांचे 17 व्या शतकात त्यांनी हकालपट्टी केली. काही काळे लोग दक्षिण अफ्रिकेत स्थलांतरित झाले. जुलू ,स्वानिज, बुशेआनाज, भाषिकांचे विभिन्न कबिले निर्माण झाले. त्यांना गोरे लोक नेटीव समजू लागले. 19 व्या शतकात गो-या लोकांचे दक्षिण अफ्रिकेवर राज्य स्थापन झाले . एक लाख गोरे , 5 लाख काळया नेटिव लोकांवर राज्य करु लागले. स्थानिक नेटिव काळे लोक आळशी व अकुशल होते. गो-या लोकांना व्यापारी पिकांच्या मशागती साठी हिंदुस्तान माून कुशल व कष्टाळू भारतीय मजूरांची नितांत आवश्यकता भासू लागली. त्यासाठी त्यांनी हिंदुस्तानातुन करारावर मजूर आयात करण्यासाठी इंग्लैंड मधील गव्हर्नर कडे मागणी केली. या करारामुळे गिरमिटिया मजूरांचे तांडे दक्षिण अफ्रिकेच्या तीरावर धडकू लागले. आरोग्य विभागाचे प्रमाण-पत्र मिळाल्या शिवाय या मजूरांना दक्षिण अफ्रिकेच्या भूमिवर फिरण्यास बंदी होती. त्यामुळे दूरचा प्रवास करुन आलेल्या भारतीय मजूरांचे अतिशय हाल झाले. गोरे लोक या भारतीय मजूरांना रेल्वे, शेती, हॉटेल व घर कामासाठी ठेवू लागले. मजूरांची निवड करताना गाय, म्हैस, घोडे यांच्या निवडी प्रमाणे परीक्षण होऊ लागले. एखादया मजूराला ग्राउंडवर न थांबता पळविले जात असे. मजूरांचे दंड, स्नायु, मांडया तपासून नंतरच मजूरी ठरली जाऊ लागे. अंगात ताप असताना सुदा काम केले तरच मजूरी मिळत असे. या भारतीय मजूरांना मतदानाचा हक्क नव्हता. महात्मा गंधधी वयाच्या 24 व्या वर्षी नेटाल येथे दादा अब्दुल्ला अँड कंपनीत एका वर्षाकरीता 24 मई 1893 रोजी नियूक्त झाले. लंडन येथून बॅरिस्टर पदवी प्राप्त झाल्यानंतर दक्षिण अफ्रिकेतील डर्बन येथे कोर्टरुम पाहिण्यासाठी गांधी गेले होते. गो-या न्यायाधीशांने त्यांना गुजराती पगडी डोक्यावरुन खाली उतरवून घेण्याची आज्ञा केली. भारतीय संस्कृति व परंपरेनुसार पगडी उतरवणे अपमानास्पद समजले जाई त्यामुळे महात्मा गांधी यांनी न्यायाधीशांची आज्ञा ठोकरुन कोर्टा बाहेर जाणे पसंत केले. या विषयी त्यांनी स्थानिक वतर्मानपत्रात निवेदन लिहिले. प्रिटोरियाला जाताना पिटर मेरिटस बर्ग रेल्वे स्टेशन वर त्र्ॅरू]हृõ क्लास डब्यात शिरताना गांधीना गो-या लोकांनी सामानासहित प्लेटफॉर्मवर फेकून दिले. त्याकाळी काळया लोकांनी फस्ट क्लास मये प्रवास करणे अपराध समजला जाई . प्रेसिडेंट क्रूगर यांच्या महालासमोरील फूटपाथ वर चालताना पाहून तेथील पोलिसांनी पकडून महात्मा गांधी यांना झोडपले. अशा अनेक प्रसंगातून महात्मा गांधी यांचा पदोपदी अपमान व अवहेलना झेलावी लागली. त्यांच्या मनात भारतीय बांधवासाठी करुणा निर्माण झाली. तेथील भारतीय मजूरांच्या हक्कासाठी त्यांनी कायदेशीर लढाई शुरु केली. या करीता नेटाल , ट्रांसवाल, डरबन, पीटर, मेरिट्जबर्ग , जोहान्सबर्ग , प्रिटोरिया अशा अनेक ठिकाणी भारतीय मजूरांना संघटित केले. महात्मा गांधी यांच्या या चळवळीमुळे भारतीय मजूर जात, धर्म , भाषा विसरुन केवळ भारतीय या नात्याने एकत्र येऊ लागले.
भारतीय ज्ञानपीठ नवी दिल्ली यांनी लोकोदय ग्रंथमाले अंतर्गत ही 904 पृष्ठांची भव्य कांदबरी 1999 रोजी प्रकाशित केली आहे. लेखकाने ही कांदबरी प्रकाशित करताना आलेल्या आर्थिक व राजकीय अडथळयांचे वर्णन आपल्या भूमिकेत केले आहे. त्यांचा विशेष राग भाजपा व काँग्रेस वर आहे. समाजवादी पक्षाचे श्री मुलायमसिंग यांच्या सहकार्याबद्दल त्यांनी विशेष आभार मानले आहेत. इलेक्ट्रॉनिक मिडियेतील नयन-कर्ण सुखाच्या निद्रेत ही हजार पृष्ठांची कांदबरी व ती सुदा महात्मा गांधीवर आधारित कोणी वाचक संपूर्ण वाचून काढेल अशी लेखकालाच खात्री नाही त्यामुळे त्यांनी संपूर्ण कांदबरी वाचणा-या पाठकांच्या प्रतिक्रिया अवश्य मागतिल्या आहेत.
पुणे विद्यापीठाच्या हिंदी अभ्यास मंडळावर नामित सदस्य या नात्याने 2001साली एका बौठकीत ही कादंबरी मी बोर्डापुढे ठेवली. त्यावेळी काही प्रायापकांनी कांदबरी खुपच मोठी आहे हा बहाना केला. विद्याथ्र्यांना डोईजड होईल असाही युक्तिवाद केला गेला. परंतु महात्मा गांधी यांच्या आफ्रिकेतील जीवनावर हिंदी साहित्यात एवढा विस्तृत रुपात कोणीही लिहिलेले नाही. महात्मा गंधधी यांच्या या संघर्षाची कहानी नव्या पिढीला करुन देणे महत्वाचे वाटले. या कादंबरीत महात्मा गांधी यांनी दक्षिण अफ्रिकेत प्रथमत: सुरु केलेल्या सत्याग्रह आंदोलनाचे वर्णन केलेले आहे. या आंदोलनात हिंदु-मुस्लिम व अन्य धर्माचे भारतीय एकजुट झाले. महात्मा गांधी यांच्या संघर्षाची ही कहाणी आजच्या नवीन पिढी समोर आली पाहिजे. हिंदी अभ्यास मंडळाचे तत्कालीन अयक्ष डॉ. शहाबुद्दीन शेख यांनी माझा प्रस्ताव स्वीकृत केला. डॉ.गिरिराज किशोर यांना पत्राने मी ही गोष्ट कळवली तेव्हा त्यांना फारच आनंद झाला. या कांदबरीची भुमिका मी मराठीत भाषातंरीत करुन सा.साधनात प्रकाशित केली व त्यांना कळवले तेव्हा त्यांनी साने गुरुजी यांनी सुरु केलेल्या साप्ताहिकात त्यांच्या कांदबरीची भुमिका मराठीत आल्या बद्दल आभाराचे पत्र पाठवले. यामुळे पुण्याचे सेवा निवृत्त हिंदी प्रायापक डॉ.पांडुरंग कापडणीस यांनी ही कांदबरी संपुर्णपणे मराठीत भाषातंरित केली आहे व लवकरच ती प्रकाशित होणार आहे.
महात्मा गांधी यांच्या विषयी अनेक भ्रम व दंतकथा पसरलेल्या आहेत. त्यामुळे ऐतिहासिक कागदपत्रांचा आढावा घेऊन लेखकाने दक्षिण अफ्रिकेचा प्रवास केला आहे. मोहनदास गांधी हा एक अत्यंत सामान्य व्यक्ती होता परंतु दक्षिण अफ्रिकेतील अपमान, अवहेलना झेलून महात्मा गांधी यांच्या व्यक्तीमतवाला महात्मा ही पदवी का प्रदान झाली हे समजते. दक्षिण अफ्रिकेतील गांधी साहित्याचे अभ्यासक श्री हासिम-सीदात म्हणतात की च् मला या गोष्टीचा सर्वात मोठा गर्व आहे की जगातील सर्वात मोठा व किंमती हिरा दक्षिण अफ्रिकेतील खाणीत आम्हाला सापडला पंरतु गांधी नावाचा पाणीदार हिरा े आम्ही तुम्हा भारतीयांना दान दिला.छ श्री हासिम-सीदात डरबन येथे वरिष्ठ अॅटरनी व लॉ सोसयटीचे पहिले अफ्रिकन भारतीय पदाधिकारी आहेत.
लेखक आपल्या भुमिकेत लिहितात की दक्षिण अफ्रिकेचा प्रवास केल्यानंतर असे जाणवले की आपण मोहनदास पक्षावर व त्यातल्या त्यात दक्षिण आफ्रिकेतील म. गांधीवरच कादंबरी लिहिली पाहिजे. दक्षिण आफ्रिका महात्मा गांधी यांच्या स्मृतीने वेढलेली आढळली. महात्मा गांधी हे स्वातंत्र्य संघर्षातील संघर्ष-पुरुष होते, यात मुळीच संशय नाही. परंतु मोहनदास हा एक सर्वसामान्य माणसाच्या संवेदना व अनुभव यांच्या सर्वात जवळचा दुवा आहे. आगामी पिढीला मोहनदासाची जास्त गरज आहे, कारण त्यामुळे तिला समजेल की मोहनदास महात्मा गांधी कसा बनला. गांधी एक नौतिक-पुरुष असून ते समाजपुरुषसुदा आहेत, जे आपली कमजोरी कोठेही लपवत नाहीत. आपल्या चुकांची जाणीव, मोठे होण्याचे द्वार असते. या सर्व भटकंतीतून मला साक्षात्कार झाला की काही लिहिण्यापूर्वी संबंधित स्थळ, शहर, सडक या सर्वांना पाहणे किती आवश्यक ठरते. यातूनच प्रचंड रचना आकारास येत असते. नवीन विश्वाची निर्मिती करता येते. मोहनदासचा हा सर्व संघर्ष एका पराधीन भूमीवर कोणा अज्ञात सामान्य माणसासाठी केलेला संघर्ष होता. प्रत्येक विस्थापित व्यक्तीला संघर्ष हा करावा लागतोच, मग भले तो आपल्या देशातील असो अथवा परदेशातील. देशकालानुरुप यामये तीव्रता व गुणात्मक फरक असू शकतो. प्रत्येकजण आपल्या जीवनात र्निधारित, अर्निधारित अथवा अल्प र्निधारित लक्ष्याकडे वाटचाल करीत असतो. त्याकरिता तो त्याग करतो. यातना सहन करतो व काही स्वप्ने पाहतो. मोहनदासाचा उद्देश र्निधारित संघर्ष नव्हता. मी तर म्हणेन की काफिला पुढे जात राहिला व मुक्कामाचे ठिकाण स्पष्ट होत गेले. महात्मा बनण्याचा त्यांचा मार्ग हा अशाच अनिश्चित त्याग, संघर्ष, पीडा, अपमान या अरुंद वाटांतूनच पार होत गेला. महात्मा बनणे ही आंतरिक विकासाची शेवटची पायरी आहे. ही बाब सर्वच ठिकाणी लागू होते. एक महात्मा जेथे खुले पुस्तक आहे, तेथे ती एक अज्ञात पोथीसुदा आहे. खरे पाहता प्रयत्न व संघर्ष यातूनच कथा निर्माण हेधत असते . उपलबीचे शिखर दुरुन डोळयांना दिसते परंतु कथा ही नेहमी संघर्षाची असते.
श्री शौलेश मटियानी आजारी आहेत परंतु स्वस्थ होते तेव्हा म्हणायचे ... च् गिरिराजजी , गांधीची काठी लागली पाहिजे एकदा का तिचा स्पर्श झाला की कादंबरी लगेच पूर्ण होईल! छ
ही कांदबरी नव्या पिढीने जरुर वाचली पाहिजे म्हणजे त्यांना कळेल की दक्षिण आफ्रिकेतील गांधीगिरी काय होती.



पहला गिरमिटिया लेखक - डॉ. गिरिराज किशोर

प्रकाशक-
भारतीय ज्ञानपीठ
18 इन्स्टीटयूशनल एरिया
लोधी रोड, नवी दिल्ली - 110003
मुल्य - रु. 350/-
पहला गिरमिटिया

गिरिराज किशोर
पृष्ठ : 904
आईएसबीएन : 81-263-0760-9
प्रकाशित : अप्रैल २४, २००४

मराठी पाट्यासाठी केंद्र सरकारचे आदेश

गृह मंत्रालय, भारत सरकार यांच्या राजभाषा विभागाने केंद्र सरकारी कार्यालया मध्ये प्रांतीय भाषेत अर्थात महाराष्ट्रातील सर्व कार्यालयात मराठीत पाट्या, सूचना फलक,ग्राहकांसाठी मराठी नमुन्यातील फॉर्म आदि सेवा देण्या बध्दल आदेश जारी केलेले आहेत.
राजभाषा विभागाच्या पत्र संख्या 14034/34/97-रा.भा. दिनांक 04-01-2002 नुसार स्थानिक जनतेच्या सुविधेकरीता केंद्र सरकारी कार्यालयात सर्व प्रकारचे फॉर्म, नोटीस बोर्ड, सूचना, विभागीय साहित्य आम जनतेच्या हितासाठी हिंदी,इंग्रजी बरोबर मराठीत सुध्दा उपलब्ध करुन देण्याचे धोरण ठरवून दिलेले आहे. यामागे केंद्र सरकारच्या त्रिभाषा सुत्राचा आधार आहे. काही विशिष्ट फॉर्म जे सरकारी कार्यालयातील अंतर्गत कामकाजासाठी आवश्यक आहे असे फॉर्म फक्त हिंदी व इंग्रजीत भरले जातील कारण केंद्र सरकारची राजभाषा हिंदी असून इंग्रजी ही सह राजभाषा आहे.
जनतेच्या उपयोगासाठी असणारे सर्व फॉर्म , सूचना,नोटिस बोर्ड यात क्रमानुसार मराठी,हिंदी व इंग्रजी भाषेचा वापर करण्याची सक्ती आहे. परंतु हा नियमाची नेहमीच अवहेलना केली जाते. सर्वच सरकारी कार्यालयात ब्रिटीश राजसत्तेची इंग्रजी हीच भाषा प्रयोगात आणली जाते. केंद्र सरकार एका बाजुला त्रिभाषा सूत्राचा पाठपुरावा करीत आहे व सर्वच भारतीय भाषांचा विकास करण्यास कृतसंकल्प आहे. परंतु आज स्वतंत्र भारतात भारतीय भाषेच्या प्रयोगाकरीता संघर्ष करावा लागतो.
भाषेच्या राजकारणात नेहमीच भारतीय भाषेचा बळी जातो. इंग्रजीच्या वर्चस्वाबद्धल कोणीच काही ब्र शब्द उच्चारीत नाही कारण सर्वसामान्या पेक्षा राजकारणी,संस्थाचालक,नोकरशहा व शहरी लोक इंग्रजीला शरण गेले आहेत. अशावेळी भारतीय भाषेचा विकास करण्याची जबाबदारी भारतीय भाषा प्रेमी यांची आहे.

राष्ट्रभाषा


भारतीय भाषा परिवारात संस्कृतचे स्थान मातेचे तर इतर सर्व भाषेचे स्थान भगिनींचे आहे. यात हिंदी सर्व भारतीय भाषेची मोठी बहिण आहे. भारतीय जनगणना 1991 न्वये हिंदी भाषिकांची संख्या एकूण भारतीय लोकसंख्येच्या 40.20 इतकी आहे. केंद्रीय भारतीय भाषा संस्था म्हैसूर यांच्या आकडेवारीनुसार व जनगणना 1991 मधील सर्वेक्षणानुसार इतर भारतीय भाषेचे टक्केवारी मराठी-7.50, बंगाली-8.30,तेलुगु- 7.90, तमील-6.30, कन्नड-3.90, मल्याळी- 3.60, पंजाबी- 2.80, उडिया- 3.30, गुजराती- 4.90, उर्दू-5.20, असामी-1.40 इतकी आहे. भारतीय घटनेतील आठव्या परिच्छेदात एकूण 22 राष्ट्रीय भाषेचा सामावेश केलेला आहे. याशिवाय इतर 844 वेगवेगळ्या बोली भाषा भारतात अस्तित्वात आहेत.
विकीपीडिया ज्ञानकोषात सी.एम.बी.ब्रान यांच्या व्याखेनुसार कोणत्याही देशाची राष्ट्रभाषा निश्चित करण्याकरीता खास चार गुणांचा सामावेश असणे आवश्यक आहे. ते गुण म्हणजे- 1) ती भाषा त्या देशाची प्रादेशिक भाषा अथवा विशिष्ट प्रदेशातील लोकांची भाषा असावी 2) क्षेत्रीय भाषा जी त्या देशातील विशिष्ट क्षेत्रात उत्तर,दक्षिण वगैरे भागातील असावी 3) सर्वसाधारण संपुर्ण देशात बोलली व समजली जाणारी भाषा किंवा जनसमूहाची भाषा 4) केंद्रीय भाषा जी त्या देशातील सरकारी कामकाजाकरीता एक राष्ट्रीय ओळख या नात्याने वापरली जाते. शेवटच्या दोन गुण विशेषांमुळे बहुतेक भाषा या त्या देशाची वास्तविक अथवा कायदेशीर राष्ट्रीय भाषा ठरते.
15 ऑगस्‍ट 1947 पूर्वी हिंदीला राष्‍ट्रभाषा म्‍हणूनच संबोधले जात होते. स्‍वातंत्र्य चळवळीत महात्‍मा गांधी यांनी सत्‍य, अहिंसा, खादी, असहकार या बरोबर हिंदी भाषेचा वापर राष्‍ट्रीय भावना संपूर्ण देशात जागृत करण्‍यासाठी केला होता. कलकत्‍ता येथील कांग्रेस अधिवेशनात त्‍यांनी लोकमान्‍य टिळक यांच्‍या इंग्रेजी भाषेबद्दल स्‍तूती केली परंतु त्‍यांनी टिळकांना सल्‍ला दिला की येथून पुढे काग्रेस च्या मंचावर फक्‍त हिंदी भाषेत भाषण दयावे ज्‍यामुळे सर्व सामान्‍य कांग्रेस कार्यकर्ता अधिक सक्रिय होऊ शकेल.
महात्मा गांधी हिंदी आंदोलनाचे प्रमुख नेते होते. त्यांची मातृभाषा गुजराती होती. देशाच्या अखंडते करीता व देशाला एक सूत्रात बांधणारी राष्ट्रभाषा हिंदी हीच सर्वश्रेष्ठ भाषा आहे हे त्यांनी सर्वच भारतीयांना पटवुन दिले. 20 आक्टोबंर,1917 रोजी त्यांनी भडोच येथे द्वितीय गुजरात शिक्षण संमेलनात राष्ट्रभाषा संकल्पना मांडली. ते म्हणतात-
1. ती भाषा सरकारी नोकरी करीता सहज समजणारी पाहिजे.
2. त्या भाषेमुळे भारतातील अंर्तगत धार्मिक,आर्थिक, व राजकिय कामकाज शक्य व्हावे.
3. ही भाषा देशातील बहुसंख्य लोग बोलणारी असावी.
4. ही भाषा राष्ट्राकरीता सोपी असावी.
5. या भाषेचा विचार करताना क्षणिक व तात्पुरता विचार केला जाऊ नये.
या पंचसूत्राचा विचार करता त्यांनी हिंदीला राष्ट्रभाषा का संबोधले हे ध्यानात येऊ शकते.

भारत सरकारच्या प्रकाशन विभागाने डॉ.विमलेश कांती वर्मा द्वारा लिखित हिंदी और उसकी उपभाषाएं पुस्तक प्रकाशित केले आहे. त्यांनी सरकारी आकडेवारीच्या आधारे हिंदी भाषेचा सर्वेक्षण रिपोर्ट सादर केलेला आहे. द केम्ब्रिज इनसाइक्‍लोपीडिया आफ लैंग्वेज अनुसार प्रथम वीस भाषेत हिंदीचा चौथा क्रमांक तर तसेच लोकसंख्‍ये अनुसार हिंदीचा तिसरा क्रमांक आहे. परंतु यात बिहारी बोलणा-या 6.5 करोड लोकांना जोडले तर मातृभाषा या नात्याने हिंदी जगात तिस-या क्रमांकाची भाषा आहे. भारतात द्विभाषिक स्थिति मुळे अनेक प्रातांत हिंदी ही दूसरी भाषा या नात्‍यांने प्रचारात आहे. महाराष्‍ट्रात मराठी नंतर हिंदी समजणारे 86.17 लोक हिंदीचा उपयोग करतात. भारतीय भाषा परिवारात हिंदी भाषा द्वितीय भाषा म्हणून मोठया प्रमाणात सर्वत्र वापरली जाते
कोलकोता येथील कार्पोरेशन बँकेचे वरिष्ठ अधिकारी डॉ.जयंतीप्रसाद नौटियाल यांनी हिंदी भाषेच्या प्रसारावर संशोधन करुन आपला प्रबंध सादर केलेला आहे. त्यांच्या या प्रबंधात त्यांनी जागतिक आकडेवारीनुसार हे सिध्द केले आहे की हिंदी ही जगातील प्रथम क्रमाकाची भाषा आहे.त्यांनी ही आकडेवारी वर्ड अलमेनिक वरुन घेतली आहे. तसेच विविध देशातील दूतावासातील अनेक वरिष्ठ सचिवांकडून त्यांनी आकडेवारी गोळा केली आहे. त्यांच्या आकडेवारीनुसार चीन मध्ये अनेक बोली भाषा असुन त्यांचा सामावेश मंदारीन भाषेत केलेला आहे. चीन मध्ये अनेक बोली भाषिक दुसरी बोलीभाषे पासुन अनभिज्ञ आहेत. हिंदी समजणारे जगात एक अरब पेक्षा जास्त लोक आहेत जे जगातल्या अनेक देशात विभागले गेले आहेत. जगातील भाषातज्ञ हिंदीतील खडीबोलीलाच हिंदी भाषा मानतात परंतु हिंदीत अनेक बोली भाषा आहेत. उर्दूचे व्याकरण हिंदी भाषेवर आधारित आहे. ती शुध्द भारतीय भाषा आहे ज्यात काही अरबी फारसी शब्द आहेत. हिंदी जाणणारे कोणीही उर्दू भाषा सहजपणे समजू शकतात. पाकिस्तानात सिंधी,बलुची,अफगाणी या भाषा आहेत परंतु फाळणीत पाकिस्तानात भारतीय मुसलमान आपली भारतीय भाषा उर्दू तिकडे घेउन गेले. उर्दू राजकिय आश्रयामुळे तेथील स्थानिक भाषा नसुन सुध्दा राष्ट्रीय भाषा होऊ शकली. हिंदी समजणारे या देशात 80 टक्के लोक आहेत. इंग्रजी समजणारे फक्त 3 टक्के लोक आहेत. जगात इंग्रजीची टक्केवारी 4.85 इतकी आहे.

14 सप्‍टेंबर 1949 रोजी भारताने केंद्र सरकारच्या सर्व प्रशासकिय कामकाजा करीता हिंदी भाषेचा स्‍वीकार राजभाषा या नात्याने केला आहे. घटनेतील कलम ३४३ न्वये देवनागरी लिपित लिहीली जाणारी हिंदी भाषा राजभाषा आहे. हिंदीच्या संदर्भात १९४८ रोजी चक्रवर्ती राजगोपालाचारी यांनी भारतीय घटना सभेत नॅशनल लैंग्वेज (राष्ट्रभाषा) व स्टेट लैंग्वेज (राजभाषा) शब्दांचा वापर केला. घटना समितीने स्टेट लैंग्वेज करीता हिंदीत राजभाषा हा अनुवाद केला आहे. यावर काही विद्वानांनी विरोध केलेला आहे.स्टेट लैंग्वेज ऐवजी ऑफिशियल लैंग्वेज हा शब्द स्वीकार केला गेला. ऑफिशियल लैंग्वेजचा प्रयोग अर्थात हिंदीचा प्रयोग सरकारी कामकाज,प्रशासन,लोकसभा व राज्यात विधान सभेत व न्याय पालिकेत स्वीकार्य केला गेला आहे.
14 सप्टेबंर,1949 रोजी म्हणजे घटना अस्तित्वात येण्याअगोदरच तत्कालीन प्रबुद्ध राजकिय नेत्यांनी हिंदीचा स्वीकार केला. याच दिवशी भारतीय घटना सभेचे अध्यक्ष डॉ.राजेंद्र प्रसाद यांचे समारोपाचे भाषण झाले. त्यात त्यांनी हिंदी विषयी मार्गदर्शक चिंतन व्यक्त केले आहे. ते म्हणतात की आमच्या देशाच्या इतिहासात आतापर्यंत कधीच एका भाषेला सरकार दरबारी व प्रशासनात मान्यता मिळाली नाही. मला विश्वास आहे कि हिंदी भाषा अन्य भारतीय भाषेतील चांगली ग्राह्य गोष्टी स्वीकारील ज्यामुळे तिची अधोगती नाही तर विकासच होणार आहे. राजभाषा हिंदीच्या लोकसभेतील त्या चर्चेमुळे अनेक प्रांतात फूट पडू शकली असती परंतु तत्कालीन नेत्यांनी संयमाने व अभ्यासपूर्ण भाषणांनी लोकसभा जिंकली. एका केंद्रीय भाषेमुळे आपल्यातील अंतर दूर होईल. आमचे संबंध घनिष्ट होतील कारण आपली परंपरा,संस्कृती व सभ्यता एक आहे.
भारत सरकारच्या प्रकाशन विभागाने डॉ.विमलेश कांति वर्मा द्वारा संपादित लोकसभेतील भाषणांच्या संकलीत कागदपत्रांवर आधारीत हिंदी राष्ट्रभाषा से राजभाषा तक प्रकाशित केले आहे.यात सर्वच नेत्यांच्या भाषणांचा वृत्तांत आपणास वाचता येईल.

घटनेतील कलम ३५१ अत्यंत महत्वपूर्ण आहे. यात केंद्र सरकारने राजभाषा हिंदी शब्दाचा वापर न करता हिंदी शब्दाचा वापर केला आहे. या कलमात स्पष्ट केले आहे की भारतातील एकजीव संस्कृतीच्या सर्वच अभिव्यक्तींचा माध्यम या नात्याने हिंदीचा विकास करावा. त्या भाषेचा आत्मा न बदलता या भाषेत हिंदुस्तानी (जी भाषा म.गांधी यांना अभिप्रेत होती ज्यात उर्दू व संस्कृत भाषेचा समान वापर केलेला आहे) व घटनेतील आठव्या परिच्छेदातील सर्व भारतीय भाषांच्या ( ज्या आज मितीला २२ आहेत) प्रचलित शब्दांना आत्मसात केले जावे. अन्य भारतीय भाषेचे रुप,शैली,व पदावलीचे अनुकरण करुन मुख्यत संस्कृत व अन्य सर्व भाषेचे ( यात जगातील सर्व प्रचलित भाषा ज्यात इंग्रजी सुध्दा अंतर्भुत असेल) शब्द ग्रहण करुन हिंदी भाषा समृद्ध करावी. यामुळे हे स्पष्ट होते कि भारतात हिंदी ही भाषा कोणत्याही विशेष प्रदेशाची मक्तेदारी नाही. ती जशी महाराष्ट्राची आहे तशी ती तमीळ जनतेचेची सुध्दा आहे.
स्वातंत्र्य चळवळीत हिंदीचा उल्लेख हा तत्कालीन सर्वच राजकिय नेत्यांनी राष्ट्रभाषा हाच केला आहे. महात्मा गांधी यांच्या प्रेरणेने वर्धा येथे राष्ट्रभाषा प्रचार समितिची स्थापना केली गेली. आज वर्धा येथे केंद्र सरकारने जगातील पहिले महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ स्थापन केले आहे. या विद्यापीठाचे स्थलातंर काही उत्तरेतील प्राध्यापक वर्ग दिल्ली करणार होते परंतु राष्ट्रभाषा प्रचार समितिच्या प्रयत्ना मुळे ते तहकुब झाले. मा.मधुकर राव चौधरी यांच्या कार्यामुळे महाराष्ट्राच्या भूमिवर केंद्र सरकारचा हा आंतरराष्ट्रीय प्रकल्प उभा राहीला आहे. त्यांनी नागपुर येथे पहिले आंतराष्ट्रीय हिंदी सम्मेलन 10 जानेवारी,1975 रोजी आयोजित केल्यामुळे आज जगात सर्वत्र व सर्व दूतावासात 10 जानेवारी हा विश्व हिंदी दिवस पाळला जातो. 14 सप्टेबंर 1949 रोजी राजभाषा हिंदी स्वीकारल्या मुळे केंद्र सरकारच्या सर्व कार्यालयात 14 सप्टेबंर हा हिंदी दिवस पाळला जातो. याचे श्रेय सुध्दा वर्धा येथील राष्ट्रभाषा प्रचार समितीलाच आहे.
आज मनोरंजनाच्या क्षेत्रात हिंदीला तोड नाही. मुंबईच्या बॉलीवुड मधुन हिंदी वगळली तर व्यवसाय किती होईल हे गणित तपासले पाहिजे. गुजराती कलाकार परेश रावल,संजीव कुमार, बंगाली कलाकार शर्मिला टागोर,मिथुन चक्रवर्ती,मराठी कलाकार नाना पाटेकर, लता,आशा या विविध प्रांतातील कलाकारांनी हिंदी चित्रपटात आपला प्रभाव राष्ट्रीय स्तरावर पोहचविला आहे. राजकारण करण्याकरीता प्रांतीय अस्मिता ठीक आहे परंतु जर देशाचा विचार करणार असाल तर हिंदीला पर्याय नाही. अमेरीकेवर दहशती हल्ला झाल्यानंतर राष्ट्रीय सूरक्षा योजने अंतर्गत तेथे अरबी,चीनी बरोबरच आता हिंदी करीता सुद्धा करोडों डॉलरच्या भाषा शिक्षणाच्या योजना अस्तित्वात आल्या आहेत. पुणे येथील सी-डॅक या संस्थेने जिस्ट व आर्टफेशियल इंटलिजंस अंतर्गत हिंदी व अन्य भाषा विकास योजना हाती घेतल्यामुळे देशात माहिती तंत्रज्ञानात भारतीय भाषेचा मार्ग सुकर झाला. या संस्थेने हिंदी भाषा शिकण्याकरीता लिला योजना यशस्वी केली आहे. इंग्रजी माध्यमातुन हिंदी शिकवणारे हे सॉफ्टवेयर जगात प्रसिद्ध आहे. याच संस्थेने यांत्रिक अनुवाद करणारे इंग्रजी-हिंदी सॉफ्टवेयर मंत्रा (मशीन असिस्टेड ट्रांसलेशन) हे अमेरिकन सरकारने जागतिक वारसा या अंतर्गत संग्रहित केले आहे.
हिंदी संमेलन,परिसंवाद,कार्यशाळा याकरीता जेव्हा कधी उत्तर भारतात जावे लागते तेव्हा तेथील लोक महाराष्ट्राच्या विकासा बध्दल प्रशंसा व्यक्त करतात. राष्ट्रभाषा हिंदी प्रचारातील महाराष्ट्राचे योगदान ते मान्य करतात. जाज्वल्य राष्ट्रभक्ती साठी महाराष्ट्रातील विनायक दामोदर सावरकर, लोकमान्य टिळक, विनोबा भावे, महात्मा फुले, नामदार गोपाळ कृष्ण गोखले, आगरकर, कर्वे यांचा आदराने उल्लेख केला जातो. 1857 चा उठाव असो किंवा 1942 ची चले जाव चळवळ असो या सर्वच राष्ट्रीय आंदोलनात महाराष्ट्राचे नांव अग्रभागी आहे. राष्ट्रीय आंदोलनातील महाराष्ट्राचे नांव सर्वच भारतात आदराने घेतले जाते.
हिंदीत रोजगाराच्या अनेक वाटा आहेत. यात अनुवाद, पत्रकारीता, दूरदर्शन,चित्रपट,जाहिरात,विपणन,व्यापार,पर्यटन,धार्मिक संस्था इ. अनेक क्षेत्रात महाराष्ट्रातील तरुणांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो. परंतु बेरोजगार युवकांची माथी हिंदी विरोधात पेटवून राष्ट्रीय ऐक्याला तडा जाणारी वक्तव्ये टाळावीत. पुरोगामी महाराष्ट्रात आज जर हिंदीला विरोध होणार असेल तर या सारखे दुसरे दुर्दैव नाही. घटनेत हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला आहे. परंतु राष्ट्रभाषा हा शब्द कोठेच नाही. जनतेत गैरसमज पसरविणे सोपे आहे परंतु प्रामाणिकपणे देशाची राष्ट्रभाषा ठरविणे खुपच कठीण काम आहे. आज अमेरिकेत सुद्धा इंग्रजी राष्टभाषा होण्यासाठी सिनेटच्या मंजूरीच्या प्रतिक्षेत आहे. याचा अर्थ इंग्रजी तेथे महत्वाची भाषा नाही असा होत नाही. लोकशाहीत सर्वसम्मती प्राप्त होणे आवश्यक असते. जगात आज अनेक प्रमुख भाषा राष्ट्रभाषा घोषित होण्यासाठी संघर्षरत आहेत.

क्याप - डाव्या विचारांचा खोलपणा की फोलपणा ?




भांडवलशाही उद्योगपतीच्या कंपनीची समाजवादी जाहिरात टी.व्ही वर पाहून करमणुक झाली.  वोल्टास ए.सी मशीनच्या जाहिरातीतील शेत मजुराची छोटी मुलगी मालकाच्या बंगल्यात डबा घेऊन जाते.  एसी विण्डो समोर डबा उघडा धरुन त्यात थंड हवा पकडते.  ही  थंड हवा ती शेतावर राबणा-या आपल्या शेतमजूर बापाच्या तोंडावर सोडते.  जाहिरात कलात्मक आहे.  कल्पना छान आहे.  परंतु एसी मशिन घेण्याची ऐपत मजूराकडे कोठून येणार ही गरीब लोकांची जीवघेणी थट्टा आहे.
            जागतिक करणाच्या प्रचंड चक्राखाली समाजवादी कम्यूनिस्ट चळवळ नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. संयुक्त रशियाचे विघटन भांडवली अमेरिकन कंपन्यांशी स्र्पाध करणारी चीनच्या माओवादी कंपन्या यामुळे कम्यूनिस्ट चळवळीच्या मुलभूत विचार सरणीला प्रचंड हादरा बसला आहे.  कामगार चळवळीत उतरलेल्या स्वार्थी राजकिय नेतृत्वामुळे आचार संहितेची वाट लागली आहे.  गरीब शेतकरी व कामगाराच्या हिताच्या  गोष्टी सभेत बोलायच्या परंतु कुटुंब व नाते संबंधाकरीता जमीन व कारखान्याचे आर्थिक शोषण सत्तेवर आले की तहहयात करायचे.
                        हे सर्व आठवण्याचे कारण  म्हणजे स्व. मनोहर शाम जोशी यांची साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कादंबरी क्याप ।  हिंदीतील  या सुप्रसिद लेखकाने प्रेस, रेडियो, टी.व्ही वृत्तचित्र, वर्तमान पत्र मासिक या सर्वच क्षेत्रावर आपल्या प्रतिभेची छाप सोडलेली आहे.  केंद्रीय माहीती सेवा, टाईम्स ऑफ इंडिया, साप्ताहिक हिंदुस्तान आदि मिडियात काम करताना त्यांनी टी.व्ही धारावाहिक  हम लोग लिहिण्याकरीता 1984 साली संपादकाची खुर्ची सोडली. मनोहर शाम जोशी यांचा जन्म 9 ऑगस्ट 1933 रोजी अजमेर येथे झाला. त्यांचे शिक्षण अजमेर व लखनौ येथे झाले आहे. विज्ञानाचे स्नातक ,शास्त्रज्ञ व्हायचे परंतु साहित्याच्या आवडी मुळे लेखक झाले.इंग्रजी व हिंदी या दोन ही भाषेवर समान पकड त्यामुळे हिंदी साप्ताहिक हिंदुस्तान बरोबरच इंग्रजी साप्ताहिक वीक अँड रिव्ह्यू ,मॉर्निंग इकोचे संपादन प्रभावीपणे केलेले आहे.  दूरदर्शन धारावाहीकेचे जनक मनोहर शाम जोशी यांनी हमलोग,बुनियाद,मंुगेरीलाल के हसीन सपने, जमीन-आसमान,शाया इत्यादी  धारावाहीकांचे लेखन करुन मयम वर्गीयांच्या व्यथा,संवेदना प्रभावीपणे शब्दबद केल्या आहेत. हिंदी भाषेच्या नव नविन फॉर्मात लिहिताना त्यांनी व्यंग शौलीत चिमटे काढीत संवेदनेच्या अभिव्यक्तीला त्यांनी एका उंचीवर पोहचविले आहे.
                        क्याप कादंबरी ही एका कम्यूनिस्ट चळवळीकडे आकर्षित झालेल्या हिमालयातील वाल्मीकीनगर जिल्हयातील  अस्पृश्य डुम जातीतील साधारण माणसाची आहे.  कस्तुरीकोट या काल्पनिक संस्थानातील हा एक  उत्तराचंलातील  प्रदेश आहे.  उत्तर आधुनिकतेतील  मिडियाग्रस्त ढोंगी समाजाची  त्यांनी  खिल्ली उडवली आहे.  टी.व्ही व वर्तमान पत्रात छापलेल्या बातम्यांवर आपला पिढीची वाढ होत आहे.   याकरीता लेखक  च् हमारे उपवन में यहां से वहाँ तक भूल के ही फूल खिले है  या सारखी सुंदर प्रतिमा  योजतात.  क्याप  या गढवाली शब्दाचा समान हिंदी अर्थ स्पष्ट करण्याकरीता लेखक अजीब-सा, अनगढ-सा, बेकारसा, अनदेखा-सा, निराशाजनक शब्दांची योजना करतात.
                        क्याप ही एका डूम हरिजन प्रियकर व  उत्तरा नावाच्या ब्राम्हण मुलीची फसलेली प्रेमकथा आहे.  कम्यूनिस्ट क्रांतीची स्वप्ने पाहणारा डुम समाजातील ढोंगीपणामुळे निराश झालेला आहे. च्क्रांती  लिहा, क्रांती बोला, क्रांतीचे भजन करा परंतु क्रांती करु नका सारखी निराशजनक टिप्पणी कांदबरीचा नायक  करतो.  तो म्हणंतो की  कम्यूनिस्ट नेते व गरीब जनते  मधील दरी लांब वाढत आहे.  कम्यूनिस्टांनी  गरीबात जाऊन गरीबा प्रमाणे राहिले पाहिजे.  गरीबांना त्यांचे दु:ख समजुन घेणारे नेते हवे आहेत.  डाव्या विचारसरणीचा मी एक बुदीजीवी नेता आहे.  परंतु मला नेहमीच असे जाणवले आहे की आम्ही डाव्या विचारांची माणसे कॉफी हाऊस मये सिगार ओढीत  इंग्रजी पत्र पत्रिकेतील छापलेले लेख व कम्यूनिस्ट ग्रंथातील उदाहरणे तोंडावर फेकण्यात तरबेज झालो आहोत.  आमच्यात व ब्राम्हणात काय फरक राहिला आहेआमचे ब्राम्हण सुद्धा धर्म ग्रंथातील संस्कृत श्लोक घोकुन घोकुन शास्त्रार्थ करतात.  आम्ही डाव्या विचारांचे तथाकथित बुदीवादी नेते फुकटचे मिळणारे मिष्टान्न खाऊन ढेर पोटया ब्राम्हणा सारखे बनत चालेलो आहोत.
लेखक स्वत: पत्रकार असल्यामुळे सामाजिक व राजकिय परिस्थितीचे संपुर्ण भान कादंबरी लिहिताना ठेवले आहे. स्वातंत्र्यपूर्व काळातील महात्मा गांधीचा जनसामान्या वरील पगडा त्यांनी बारकाईने टिपला आहे. कार्ल मार्कस  विश्वातील सर्व कष्टकरी शेतकरी व कामगारांच्या हिताच्या संकल्पना मांडतो. तरीही भारतीय जनसामान्यांना फक्त धोतर घालुन उघडा राहणारा महात्मा अधिक भावतो. ग्रामीण जनतेला तो आपल्यातील एक मित्र वाटतो. कार्ल माक्र्स भारतातील मातीत फार मोठा प्रमाणात रुजु शकला नाही. कार्ल माक्स्चा प्रचार करणारे कम्यूनिस्ट भारतीय समाजातील देशी मन ओळख शकले नाही.  कम्यूनिस्ट विचारांना भारतीय पेहराव दिला गेला नाही.  विचार श्रेष्ठ असतात परंतु आचरणात आणण्याकरीता येथील जमीनीत बीज रुजवावे लागते.  ही मेहनत घेणारी फारच थोडी मंडळी कम्यूनिस्ट चळवळीत आढळते.
लेखकाने कांदबरीच्या नायकाचे काका खीमराज यांचे कम्यूनिस्ट कार्यकत्र्याचे चरित्र वर्णन केले आहे.  काकांची साधी राहणी, कष्टकरी जनतेत समरस होणे व  कार्ल  माक्र्सच्या  विचारांचा प्रसार पहाडी प्रदेशात निष्ठेने करणे याचे सुंदर चित्रण केले आहे.     कस्तुरीकोटच्या खीमराव काकावर  अल्मोडाचे कॉम्रेड  पूरन चंद्र जोशी, लेनिन, स्टालिन, कार्ल माक्र्सच्या विचारांचा पगडा आहे.  पहाडी क्षेत्रातील गरीब र्निधन जनतेच्या लोकसंगीत, लोकगीतांचा उपयोग करीन खीमराज काका कम्यूनिस्ट विचारांचा प्रसार करतात.
ही संपूर्ण कादंबरी मनोहर श्याम जोशी यांनी गप्पा गोष्टीच्या स्वरुपात लिहली आहे.  कस्तुरीकोटच्या काल्पनिक उत्तरांचलातील पहाडी  लोकांच्या जीवनात गप्पागोष्टींना विशेष महत्व आहे लेखक म्हणतात की या गप्पांच्या सवयीमुळे येथील लोक आत्महत्या करण्यास भाग पाडण्या-या विषम परीस्थितीत सुदा जीवन सुखकारक करण्याची  धडपड करतात. 
या कादंबरीला साहित्य अकादमीचा 2006 वर्षाचा हिंदी भाषेतील उत्कृष्ट साहित्य प्रकाराचा पुरस्कार मिळाला आहे. हिंदी साहित्याची सेवा करणारा एक महान लेखक 30 मार्च,2006 रोजी स्वर्गवासी झाले आहेत. ते गेल्यामुळे आज त्यांच्याच भाषेत हिंदी वाचक म्हणतो की  सब कुछ क्याप लग रहा है ।

क्याप  लेखक- श्याम मनोहर जोशी
पृष्ठ: 151
 प्रकाशकवाणी प्रकाशन
आईएसबीएन: 81-7055-799-2
प्रकाशितमार्च २६, २००६