MarathiBlogNet

शुक्रवार, 20 जनवरी 2023

भाषा आक्रमण

 "भाषा आक्रमण "


हिंदी भाषाच मुळी परकीय आक्रमणातून जन्माला आली आहे. भारतीय भाषेत अनेक परकीय भाषेतील शब्द समाविष्ट झाले आहेत. कोणत्याही भाषेला अभिजात तेव्हाच मानावे लागेल जेव्हा ती अनेक भाषिक आक्रमणाने नष्ट न होता उलट ती नवे रूप,नवा अवतार,नवा वेग घेऊन मार्ग काढते.

 भाषा अस्पृश्य नसते. भाषा ही संक्रमणातून सरमिसळ होऊन वेगाने पुढे जाणारी मानवीय घटना आहे. भाषेचे अस्तित्व हे कोणत्याही आक्रमणा मुळे किंवा परकीय भाषेमुळे संकटात येत नाही. भाषेचा वापर करणारी समाज रचना जर मोडकळीस आली तर बोल कोणास लावावे ? आपल्या भाषेचा उपयोग आपण दैनंदिन कारभारात करत नाही हे दुर्दैवी गोष्ट आहे.

महाराष्ट्रात सरकारी नोकरीत अधिकारी ते कर्मचारी या सर्व वर्गाला हिंदी चाचणी परीक्षा उत्तीर्ण करने शासकीय आदेशानुसार आवश्यक आहे.

मराठी भाषिक श्रीमती राज्येश्री जयराम यांचा धारावी झोपडपट्टीतील संवाद भाषा हा प्रबंध जरूर वाचा. केंद्रीय भारतीय भाषा संस्थान, म्हैसूर संस्थेने प्रकाशित केला आहे.

🙏

#मराठी

#हिंदी

#भाषा

#आंतर_भारती

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें